Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

G Ram G Bill: लोकसभेत प्रचंड गदारोळात ‘जी रामजी’ रोजगार विधेयक मंजूर; विरोधकांनी फाडली विधेयकाची पाने

G Ram G Bill: लोकसभेत प्रचंड गदारोळात ‘जी रामजी’ रोजगार विधेयक मंजूर; विरोधकांनी फाडली विधेयकाची पाने

G Ram G Bill: संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान गुरुवारी लोकसभेत मनरेगा ऐवजी ‘जी-रामजी’ (रोजगार आणि उपजीविकेसाठी बदली) अर्थात भारत रोजगार आणि उपजीविकेसाठी हमी मिशन (ग्रामीण) विधेयक मोठ्या गदारोळात मंजूर करण्यात आले. विरोधी पक्षाच्या खासदारांनी विधेयकाला तीव्र विरोध करत त्याची पाने फाडून संसदेच्या वेलीत फेकली. अधिवेशनादरम्यान विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करत सभागृहाचे कामकाज ठप्प करण्याचा प्रयत्न केला. मात्र, गोंधळातही हे विधेयक आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले.

शिवराज सिंह चौहान यांचे आक्रमक प्रत्युत्तर

विधेयकावर उत्तर देताना केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, काँग्रेसने कधीही महात्मा गांधींचे विचार ऐकले नाहीत. आम्ही गांधीजींवर विश्वास ठेवतो. गांधीजींनी स्वातंत्र्यानंतर काँग्रेस विसर्जित व्हावी असे मत व्यक्त केले होते, असे सांगत त्यांनी पुढे म्हटले की, ज्या दिवशी काश्मीरला विशेष दर्जा देण्यात आला, त्याच दिवशी संविधानाची हत्या झाली.

हेही वाचा – Pradhya Satav Join BJP: काँग्रेसला हिंगोलीत मोठा धक्का! डॉ. प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

मनरेगामध्ये भ्रष्टाचार, निधीचा गैरवापर: शिवराज

शिवराज सिंह चौहान यांनी आरोप केला की, काँग्रेस सरकारने मनरेगा योजनेला भ्रष्टाचाराच्या हाती सोपवले. काँग्रेसच्या तोंडावर राम आहे, पण हातात चाकू आहे, असा घणाघात करत त्यांनी निधीच्या गैरवापराचा आरोप केला. ते म्हणाले की, मोदी सरकारने मनरेगामधील अनेक त्रुटी दूर केल्या असून, जी-रामजी विधेयकामुळे शेतकरी आणि गरीब घटकांना थेट लाभ होणार आहे. आमच्या सरकारने निधी विकास प्रकल्पांसाठी वापरला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रियंका गांधींवर निशाणा

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वड्रा यांच्या टीकेला उत्तर देताना शिवराज सिंह चौहान म्हणाले की, महात्मा गांधींच्या नावाऐवजी काँग्रेसने सरकारी योजनांची नावे नेहरू कुटुंबाच्या नावावर ठेवली. हे गांधीजींच्या विचारांशी विश्वासघात आहे.

विरोधकांचा निषेध कायम

विधेयक मंजूर होत असतानाही विरोधी पक्षांचा गदारोळ सुरूच राहिला. विरोधकांनी हा कायदा गरीबविरोधी असल्याचा आरोप करत सभागृहात निषेध नोंदवला. तरीही सरकारने विधेयक मंजूर करून पुढील प्रक्रियेसाठी पुढे नेले.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!