Today रविवार, 26th जुलै 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pradhya Satav Join BJP: काँग्रेसला हिंगोलीत मोठा धक्का! डॉ. प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

Pradhya Satav Join BJP: काँग्रेसला हिंगोलीत मोठा धक्का! डॉ. प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

Pradhya Satav Join BJP: काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी आणि विधान परिषदेतील आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांनी आज आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपचे कमळ हाती घेतले. सातव यांच्या या टोकाच्या निर्णयामुळे काँग्रेसला हिंगोली जिल्ह्यात मोठा राजकीय धक्का बसला आहे. गेल्या काही महिन्यांपासून प्रज्ञा सातव काँग्रेसमध्ये असंतुष्ट होत्या. त्यामुळे भाजपमध्ये प्रवेश करण्याची चर्चा लवकरच रंगली होती. आज सकाळी त्यांनी विधिमंडळ सचिवालयाकडे आपला राजीनामा सुपूर्द करून औपचारिकता पूर्ण केली. राजीव सातव हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे जवळचे सहकारी होते. त्यामुळे प्रज्ञा सातव यांचा राजीनामा पक्षासाठी गंभीर धक्का मानला जात आहे.

हेही वाचा –Pradnya Satav: काँग्रेसला मोठा धक्का! दिवगंत राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा भाजपमध्ये प्रवेश करणार

राजीनामा सादर केल्यानंतर प्रज्ञा सातव भाजप प्रदेश कार्यालयात पोहोचल्या, जिथे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. यावेळी हिंगोलीमधील त्यांच्या समर्थकांचीही उपस्थिती होती. प्रज्ञा सातव यांनी भाषणात भाजपच्या धोरणानुसार “सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास व सबका विश्वास” या मार्गदर्शनाखाली काम करण्याची ग्वाही दिली.

हेही वाचा – Gadchiroli Accident: अजित पवारांना मोठा धक्का! राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश उपाध्यक्षांचा अपघातात मृत्यू

विकसित हिंगोलीसाठी समर्पण

मंत्र्यांनी सांगितले की, विकसित हिंगोलीसाठी प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश महत्त्वाचा आहे. हिंगोली जिल्हा विकासापासून वंचित राहिला आहे, आणि राजीव सातव यांनी जिल्ह्यातील शेतकरी, मजूर व कमजोर घटकांसाठी जीवनभर काम केले. प्रज्ञा सातव यांनीही मागील ३० वर्षांपासून राजीव सातव यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोलीतील समस्यांवर काम केले. बावनकुळे म्हणाले, “विकसित महाराष्ट्राला विकसित हिंगोली जोडण्यासाठी प्रज्ञा सातव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.”

पक्षात असंतोष आणि टोकाचा निर्णय

राजीव सातव यांच्या निधनानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद निर्माण झाले होते. विधान परिषदेच्या आमदारकीसाठी डॉ. सातव यांचे नाव चर्चेत असताना तत्कालीन पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी त्यांना बाजूला ठेवून इतर नावाला प्राधान्य दिले. यामुळे डॉ. सातव आणि वर्षा गायकवाड यांच्यात तणाव निर्माण झाला आणि पक्षात गटबाजी वाढली. काँग्रेसच्या नेत्यांकडून समन्वय साधण्यासाठी प्रयत्न न झाल्याने अखेर डॉ. प्रज्ञा सातव यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!