Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

1300 लोकसंख्या पण 27000 जन्म-मृत्यू दाखले! महाराष्ट्राच्या ‘या’ गावात मोठा घोटाळा उघड

1300 लोकसंख्या पण 27000 जन्म-मृत्यू दाखले! महाराष्ट्राच्या ‘या’ गावात मोठा घोटाळा उघड

Birth and Death Certificate Scam: यवतमाळ जिल्ह्यातील शेंदुरसनी ग्रामपंचायतीमध्ये एक संशयास्पद प्रकार उघडकीस आला आहे. अवघ्या १३०० लोकसंख्या असलेल्या या छोट्याशा गावातून तब्बल २७,००० हून अधिक जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्रांचे वाटप झाल्याचे समोर आले आहे. या महाघोटाळ्याचे गांभीर्य लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने आता विशेष तपास पथकामार्फत (SIT) चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

लोकसंख्येपेक्षा नोंदी २० पटीने जास्त

शेंदुरसनी गावाची अधिकृत जनगणना अत्यंत मर्यादित असताना, नागरी नोंदणी प्रणालीत (CRS) झालेल्या या नोंदींनी प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. केवळ तीन महिन्यांच्या अल्पावधीत २७,३९८ प्रकरणांची ‘विलंबित जन्म नोंदणी’ करण्यात आली. गावाच्या मूळ लोकसंख्येच्या तुलनेत हा आकडा विसंगत असल्याने, डिजिटल पोर्टलचा वापर करून बनावटगिरी केली गेल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

सायबर पोलीस आणि आरोग्य विभागाची संयुक्त कारवाई

या प्रकरणाचा तपास करण्यासाठी गृह विभागाने कंबर कसली असून, अतिरिक्त पोलीस महासंचालकांच्या (महाराष्ट्र सायबर) नेतृत्वाखाली ‘SIT’ स्थापन केली आहे. या पथकात तांत्रिक तज्ज्ञांसह जिल्हा आरोग्य अधिकारी आणि आरोग्य सेवा उपसंचालकांचाही समावेश आहे. यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात यापूर्वीच आयटी ॲक्ट आणि भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, तपासात प्रमाणपत्रे नेमकी कोणत्या ठिकाणाहून आणि कोणत्या उपकरणावरून अपलोड झाली, याचा शोध घेतला जाईल. ज्यांच्या नावावर हे दाखले काढले गेले, त्या व्यक्तींचे अस्तित्व आणि त्यांचा या गावांशी असलेला संबंध तपासला जाणार आहे. तसेच सरकारी सॉफ्टवेअरमधील पळवाटा शोधून भविष्यात असे गैरप्रकार रोखण्यासाठी नवी नियमावली तयार केली जाईल. प्रशासकीय यंत्रणेचा वापर करून एखादे मोठे रॅकेट बनावट दाखले तयार करत होते का? याचा शोध आता हे विशेष पथक घेणार आहे. या आठवड्यात SIT प्रत्यक्ष ग्रामपंचायतीत जाऊन कागदपत्रांची पडताळणी करणार आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!