Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Mayor Election 2026: भाजपचे 50 नगरसेवक, पण महापौर शिवसेनेचाच होणार! KDMC मध्ये आरक्षणाने फिरवलं सत्ताचक्र

Mayor Election 2026: भाजपचे 50 नगरसेवक, पण महापौर शिवसेनेचाच होणार! KDMC मध्ये आरक्षणाने फिरवलं सत्ताचक्र

Mayor Election 2026: केडीएमसीच्या राजकारणात एक अभूतपूर्व पेच निर्माण झाला आहे. संख्याबळ असूनही आरक्षणाच्या एका गुगलीमुळे भाजपला महापौरपदाच्या शर्यतीतून बाहेर पडावे लागले आहे. यंदाचे महापौरपद अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने ५३ नगरसेवक असलेल्या शिवसेनेकडे (शिंदे गट) सत्तेच्या चाव्या गेल्या आहेत. या साऱ्या राजकीय नाट्यात अटाळीच्या नगरसेविका हर्षाली थविल यांचे नाव शहराच्या पहिल्या नागरिक म्हणून आघाडीवर आले आहे.

साधी राहणी, मोठी स्वप्ने: कोण आहेत हर्षाली थविल?

हर्षाली थविल यांची चर्चा केवळ आरक्षणापुरती मर्यादित नाही. त्या सलग दुसऱ्यांदा निवडून आल्या असून आजही एका साध्या भाड्याच्या घरात राहतात. कॉर्पोरेशनच्या राजकारणात जिथे कोट्यवधींची उलाढाल होते, तिथे एक सामान्य कुटुंबातील महिला शहराचे सर्वोच्च पद भूषवणार असल्याने जनमानसात त्यांच्याबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

महायुतीचं गणित: मनसेची साथ, भाजपचा नवा प्लॅन

केडीएमसीच्या सभागृहात सत्तेचे समीकरण आता स्पष्ट होत आहे:

  • शिवसेना (शिंदे गट): ५३ नगरसेवकांसह सर्वात मोठा पक्ष. महापौरपदासाठी हर्षाली थविल आणि किरण भांगले हे दोन पर्याय सज्ज आहेत.
  • भाजप: ५० नगरसेवक असूनही प्रवर्गातील उमेदवार नसल्याने महापौरपदाची संधी हुकली. आता भाजप उपमहापौरपद आणि स्थायी समिती यांसारख्या महत्त्वाच्या आर्थिक पदांवर आपला दावा ठोकणार आहे.
  • मनसे: राज ठाकरेंच्या ५ नगरसेवकांनी शिंदे गटाला पाठिंबा जाहीर केल्याने सत्तेचा मार्ग अधिक सुकर झाला आहे.
  • ठाकरे गट: ११ नगरसेवकांसह विरोधी पक्षात बसण्याची चिन्हे आहेत.
Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!