Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

‘AI ला नियंत्रित करा, नाहीतर ते तुम्हाला नियंत्रित करेल…’; नागपूरमध्ये मोहन भागवतांचा इशारा

‘AI ला नियंत्रित करा, नाहीतर ते तुम्हाला नियंत्रित करेल…’; नागपूरमध्ये मोहन भागवतांचा इशारा

Mohan Bhagwat on AI : नागपूर पुस्तक मेळाव्यात बोलताना आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) वाढत्या वापराबाबत महत्त्वपूर्ण भूमिका मांडली. तंत्रज्ञान वेगाने विकसित होत असताना मानवांनीच यंत्रांचे नियंत्रण राखले पाहिजे, असे ते म्हणाले. एआय थांबवणे शक्य नाही, परंतु ते वापरणारे आपण आहोत की वापरले जाणारे हे आपण ठरवायचे आहे, असंही मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. मोबाईल फोनचे उदाहरण देत त्यांनी सांगितले की एकेकाळी फोन हा आपल्यासाठी साधन होता, परंतु आता लोक फोनच्या अधीन झाल्यासारखे दिसतात.

मानवहितासाठी तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक

भागवत यांनी एआयचा योग्य वापर मानवकल्याणासाठी व्हायला हवा, असे स्पष्ट केले. तंत्रज्ञानामुळे मानवी भावनांचा ऱ्हास होईल अशी भीती व्यक्त होत असली, तरी अशा परिस्थिती येण्यापूर्वीच आपण सज्ज व्हायला हवे, असे ते म्हणाले. त्यांच्या म्हणण्यानुसार, साधने ही फक्त साधने असतात. ती कशी आणि कुठे वापरायची हे ठरवणे मानवाच्या हातात आहे.

हेही वाचा – ‘हिंदूंशिवाय जगाचे अस्तित्व…’; मोहन भागवत यांचे वक्तव्य चर्चेत, नेमकं काय म्हणाले RSS प्रमुख? वाचा

भावना, बुद्धी आणि तंत्रज्ञानात संतुलन आवश्यक

मानवी जीवन हे केवळ भौतिक सुखावर चालत नाही. मन, बुद्धी आणि आत्मिक आनंद यांच्यात संतुलन आवश्यक असते, असे भागवत यांनी सांगितले. हे संतुलन जपले, तर एआयच्या युगातही मानव स्वतःच्या मूल्यांवर ठाम राहू शकतो आणि तंत्रज्ञानाचा स्वामी बनू शकतो, असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!