Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

श्रीलंकेत दितवाह चक्रीवादळामुळे हाहाकार! 123 जणांचा मृत्यू; भारताचा मदतीचा हात

श्रीलंकेत दितवाह चक्रीवादळामुळे हाहाकार! 123 जणांचा मृत्यू; भारताचा मदतीचा हात

श्रीलंका: श्रीलंकेत दितवाह चक्रीवादळामुळे मुसळधार पाऊस आणि पुराने थैमान घातलं आहे. जनजीवन विस्कळीत झालं आहे. आपत्ती व्यवस्थापन केंद्राने (डीएमसी) दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 123 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 130 जण अजूनही बेपत्ता आहेत. श्रीलंकेच्या अनेक भागात मुसळधार पाऊस आणि भूस्खलन झालं आहे, ज्यामुळे लाखो लोक प्रभावित झाले आहेत.

श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की सशस्त्र दलांच्या मदतीने मदत कार्य सुरू आहे आणि आतापर्यंत 43,995 घरं उद्ध्वस्त झालेल्या लोकांना सरकारी कल्याण केंद्रांमध्ये हलवण्यात आलं आहे. श्रीलंकेच्या सरकारने अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी लष्करी हेलिकॉप्टर आणि बोटींचा वापर केला आहे. दितवाह चक्रीवादळामुळे शुक्रवारी श्रीलंकेच्या उत्तर आणि मध्य भागात मुसळधार पाऊस आणि भूस्खलन झालं. मुसळधार पावसामुळे अंदाजे 44,000 लोक प्रभावित झाले आणि अनेकांना तात्पुरत्या मदत छावण्यांमध्ये पाठवण्यात आलं.

अनेक भागात पाणी साचल्याने सार्वजनिक सेवा विस्कळीत होत आहेत आणि पायाभूत सुविधांचं मोठं नुकसान होत आहे. श्रीलंकेच्या लष्कर आणि पोलीस दलांनी मदत आणि बचावकार्य तीव्र केले आहे. कोलंबोपासून सुमारे 220 किलोमीटर ईशान्येकडील पोलोन्नरुवा येथील पुलावर अडकलेल्या तेरा जणांना हेलिकॉप्टरने वाचवण्यात आलं. मुसळधार पावसामुळे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील कामकाज विस्कळीत झालं, ज्यामुळे 15 उड्डाणं त्रिवेंद्रम आणि कोचीन विमानतळांवर वळवण्यात आली.

दितवाह चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या श्रीलंकेला मदत करण्यासाठी भारताने ऑपरेशन सागर बंधू सुरू केलं आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून, भारतीय हवाई दलाचे विमान सुमारे 12 टन मदत साहित्य घेऊन श्रीलंकेत पोहोचले, ज्यात ताडपत्री, ब्लँकेट, स्वच्छता किट, अन्नपदार्थ आणि इतर आवश्यक साहित्य समाविष्ट आहे.

भारतीय नौदलानेही मदत साहित्य पाठवलं आहे. आयएनएस विक्रांत आणि आयएनएस उदयगिरी येथून सुमारे 4.5 टन रेशन आणि 2 टन रेशन पोहोचवण्यात आलं. ही मदत भारत सरकारने नेबरहूड फर्स्ट धोरणांतर्गत पाठवली आहे आणि श्रीलंकेतील परिस्थिती बदलत असताना भारताने आणखी मदत पाठवण्याचं आश्वासन दिलं आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!