Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Raghav Chadha Join BJP: मोठी बातमी! आम आदमी पक्षात मोठं बंड; राघव चढ्ढा यांच्यासह 3 खासदारांचा भाजपमध्ये प्रवेश

Raghav Chadha Join BJP: मोठी बातमी! आम आदमी पक्षात मोठं बंड; राघव चढ्ढा यांच्यासह 3 खासदारांचा भाजपमध्ये प्रवेश

Raghav Chadha Join BJP: दिल्लीच्या राजकारणात आज एक मोठा भूकंप झाला आहे. आम आदमी पक्षाचे (AAP) चाणक्य मानले जाणारे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांच्यासह संदीप पाठक आणि अशोक मित्तल या तीन दिग्गज नेत्यांनी अधिकृतपणे भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश केला आहे. अरविंद केजरीवाल यांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे हे नेते आता ‘कमळ’ हाती घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

केजरीवालांच्या ‘चाणक्या’ने का सोडली साथ?
पक्षांतराचा निर्णय घेतल्यानंतर संदीप पाठक यांनी आपली खंत व्यक्त केली. ते म्हणाले, “आम्ही नेहमीच स्वतःपेक्षा पक्षाला आणि अरविंद केजरीवाल यांना मोठे मानले. देशातील लाखो कार्यकर्त्यांनी रक्ताचे पाणी करून हा पक्ष उभा केला.” मात्र, पक्षात गेल्या काही काळापासून घुसमट होत असल्याचे संकेत त्यांनी दिले असून, पक्ष सोडण्याचा निर्णय घेणे भाग पडल्याचे त्यांनी सांगितले.

अपात्रतेची भीती संपली?
राघव चढ्ढा यांनी या बंडाला कायदेशीर स्वरूप दिले आहे. चढ्ढा यांच्या दाव्यानुसार, राज्यसभेतील ‘आप’च्या एकूण सदस्यसंख्येच्या दोन-तृतीयांश बहुमत त्यांच्याकडे आहे. संविधानातील तरतुदीनुसार, एवढ्या मोठ्या संख्येने सदस्य बाहेर पडल्यास त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होऊ शकत नाही. या तांत्रिक बळावर त्यांनी आपला गट थेट भाजपमध्ये विलीन करण्याचा निर्णय घेतला आहे.

बंडाची व्याप्ती वाढणार; आणखी ४ खासदारांचा पाठिंबा?
केवळ हे तीनच नव्हे, तर पक्षाचे इतर मोठे चेहरेही आमच्या संपर्कात असल्याचा दावा चढ्ढा यांनी केला आहे. यामध्ये हरभजन सिंग, स्वाती मालीवाल, विक्रमजित सिंग साहनी आणि राजेंद्र गुप्ता या खासदारांचाही समावेश असल्याचा खळबळजनक दावा करण्यात आला आहे. जर हा दावा खरा ठरला, तर राज्यसभेत आम आदमी पक्षाचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता आहे. दरम्यान, अरविंद केजरीवाल यांच्यासाठी हा आतापर्यंतचा सर्वात मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. एकीकडे भ्रष्टाचाराच्या आरोपांशी झुंजत असताना, दुसरीकडे पक्षातील अंतर्गत फुटीमुळे ‘आप’च्या गोटात चिंतेचे सावट पसरले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!