Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Bawankule On Sanjay Raut: ‘2047 पर्यंत मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीचे स्वप्न पाहू नका…’; बावनकुळेंचा संजय राऊतांना टोला

Bawankule On Sanjay Raut: ‘2047 पर्यंत मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीचे स्वप्न पाहू नका…’; बावनकुळेंचा संजय राऊतांना टोला

Bawankule On Sanjay Raut: महाराष्ट्राचे महसूल मंत्री आणि भाजपचे निवडणूक प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांच्यावर बोचरी टीका केली आहे. ‘सचिवालयाच्या सहाव्या मजल्यावर (मुख्यमंत्री कार्यालय) आपला प्रतिनिधी बसेल, असे दिवास्वप्न राऊतांनी पाहू नये. २०४७ पर्यंत तिथे केवळ भाजप आणि महायुतीचाच मुख्यमंत्री असेल,’ असे मोठे विधान बावनकुळे यांनी केले आहे.

संजय राऊतांच्या ‘दिवास्वप्ना’वर बावनकुळेंचा प्रहार
मुंबईतील मंत्रालयात मुख्यमंत्र्यांचे कार्यालय सहाव्या मजल्यावर आहे. यावरून राजकीय टोलेबाजी करताना बावनकुळे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी विकसित महाराष्ट्राचे काम सुरू केले आहे. त्यामुळे पुढील अनेक दशके ही जागा महायुतीकडेच राहणार आहे. संजय राऊत यांनी २०२७ किंवा त्यापुढील काळासाठी जो विचार सुरू केला आहे, तो त्यांनी थांबवावा, असा सल्लाही त्यांनी दिला.

हेही वाचा – Cabinet Decisions: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! फडणवीस सरकारने घेतले ‘हे’ धडाकेबाज निर्णय

“नगरसेवक सांभाळता येत नाहीत अन दोष भाजपला देता?”
चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीवरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर गंभीर आरोप केले होते. भाजप काँग्रेसच्या नगरसेवकांना प्रत्येकी 1 कोटी रुपयांची ऑफर देत असल्याचा दावा वडेट्टीवारांनी केला होता. याला उत्तर देताना बावनकुळे म्हणाले, ‘आम्हाला कोणाशीही वाटाघाटी करण्याची गरज नाही. काँग्रेसने त्यांचे नगरसेवक स्वतः हाताळावेत. त्यांचा पक्ष दोन गटात विभागला गेला आहे आणि त्यांच्या अंतर्गत वादाला भाजप जबाबदार नाही.’

महापौर निवडीचा पेच आणि अमरावतीवर दावा
राज्यातील ज्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या आहेत, तिथे महापौर कधी पदभार स्वीकारतील? या प्रश्नावर बावनकुळे यांनी स्पष्ट केले की, भाजप कोअर कमिटीच्या बैठकीनंतर प्रत्येक महापालिकेबाबत टप्प्याटप्प्याने निर्णय घेतला जाईल. मात्र, अमरावती महानगरपालिकेचा महापौर हा भाजपचाच असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विजय वडेट्टीवार यांचा नेमका आरोप काय?
विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूरच्या राजकारणात पैशांचा पाऊस पाडला जात असल्याचा आरोप केला होता. ‘भाजपकडे सत्ता आणि पैसा आहे. ते प्रत्येकी 1 कोटी रुपयांची आणि पदांची ऑफर देत आहेत. या निवडणुकीत कोणती जादूची काठी आणि पैसा चालणार, हे आज सांगणे कठीण आहे,’ असे वडेट्टीवार म्हणाले होते.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!