Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पुणे-नाशिक महामार्गावर नारायणगाव बायपासजवळ टँकरमधून गॅस गळती; वाहतूक विस्कळीत

पुणे-नाशिक महामार्गावर नारायणगाव बायपासजवळ टँकरमधून गॅस गळती; वाहतूक विस्कळीत

पुणे: सकाळी पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगाव बायपासजवळ आज गॅसने भरलेला टँकर ट्रक गळती झाल्याने वाहनचालक आणि स्थानिकांमध्ये घबराट पसरली. ही घटना वर्दळीच्या लेनवर वाहतूक सुरू असताना घडली. एका सरकारी माध्यम चॅनेलच्या दृश्यांनुसार, रस्त्याच्या मधोमध गॅस वाहून नेणाऱ्या टँकरमध्ये ही गळती झाली. गळती झालेल्या गॅसचा तीव्र वास परिसरात वेगाने पसरला, ज्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाली. तथापि, या घटनेत कोणतीही दुखापत किंवा जीवितहानी झाली नाही. आपत्कालीन पथके घटनास्थळी दाखल झाली असून मदतकार्य सुरु आहे.

पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर लक्झरी कार जळून खाक

दरम्यान, शनिवार सायंकाळी 4:30 वाजता, पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर झालेल्या अपघातात एक उच्च दर्जाची ऑडी कार जळून खाक झाली. कारमध्ये प्रवासी आयुष फाळके याला किरकोळ दुखापत झाली. सुदैवाने, त्याच्यासह कारमधील तिघे जण सुरक्षित बाहेर पडले. घटनेवेळी, ऑडी कार पुण्याहून मुंबईकडे जात असताना खराडीजवळ चालकाचे नियंत्रण सुटले आणि ती मागून येणाऱ्या टेम्पोला धडकली.

धडकेनंतर कारने पेट घेतला. त्यानंतर काही वेळातचं कार जळून खाक झाली. पिंपरी-चिंचवड अग्निशमन दलने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि अखेर आगीवर नियंत्रण मिळवले. या दुर्घटनेमुळे पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळासाठी थांबवण्यात आली होती, परंतु वाहन हटवल्यानंतर वाहतूक पुन्हा सामान्य झाली.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!