Today गुरूवार, 17th सप्टेंबर 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Thane Crime : तिसऱ्या मजल्यावरचा स्लॅब दुसऱ्या मजल्यावर कोसळून 4 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

Thane Crime : तिसऱ्या मजल्यावरचा स्लॅब दुसऱ्या मजल्यावर कोसळून 4 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

ठाणे : मिरा रोडच्या नयानगर परिसरातील नूरजहान इमारतीत घडलेल्या भीषण दुर्घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. चाळीस वर्षे जुनी आणि जीर्ण अवस्थेतील या इमारतीच्या तिसऱ्या मजल्याचा स्लॅब कोसळून थेट दुसऱ्या मजल्यावर पडला. या दुर्घटनेत एका चार वर्षीय निरागस मुलाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचे वडील गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ही दुर्दैवी घटना नयानगर येथील नूरजहान इमारतीत घडली. स्लॅब कोसळल्याने दुसऱ्या मजल्यावरील रहिवाशांच्या घरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या दुर्घटनेत एका चार वर्षीय मुलाचा मृत्यू झाला, तर त्याच्या वडिलांना गंभीर दुखापत झाली.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर इमारतीतील इतर रहिवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. प्रशासनाने इमारत रिकामी करण्याचे आदेश दिले असून, पुढील तपास सुरू आहे.

नूरजहान इमारत सुमारे 40 वर्षे जुनी असून, ती धोकादायक अवस्थेत होती. तरीही, मिरा-भाईंदर महानगरपालिकेने यापूर्वी या इमारतीला धोकादायक घोषित करून रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्याची कोणतीही ठोस कारवाई केली नव्हती. या दुर्घटनेनंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. “जर वेळीच इमारत रिकामी केली असती, तर एका निष्पाप बालकाचा जीव वाचला असता,” असा सवाल स्थानिक रहिवासी उपस्थित करत आहेत. महानगरपालिकेच्या कार्यपद्धतीवर आणि निष्काळजीपणावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

या घटनेने नयानगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. स्थानिक रहिवाशांनी प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “इतकी जुनी आणि जीर्ण इमारत धोकादायक असल्याचे माहीत असतानाही प्रशासनाने दुर्लक्ष का केले? याला जबाबदार कोण?” असे प्रश्न नागरिकांनी उपस्थित केले आहेत. तसेच, अशा धोकादायक इमारतींचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करून योग्य कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!