Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

मुंबई महापौरपदावर राजकीय धुसफूस! शिंदे गटातील नगरसेवक उद्धव ठाकरेंकडे परतणार का?

मुंबई महापौरपदावर राजकीय धुसफूस! शिंदे गटातील नगरसेवक उद्धव ठाकरेंकडे परतणार का?

मुंबई : महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर महापौर कोण होणार, यावरून शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. २२७ सदस्यांच्या सभागृहात भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची युती बहुमतात असली, तरी महापौरपदाच्या वाटपावरून संभ्रम निर्माण झाला आहे. भाजपला ८९, शिंदे गटाला २९, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेना (यूबीटी)ला ६५ जागा मिळाल्या आहेत.

महापौरपदासाठी शिंदे गट आग्रही असल्याची चर्चा सुरू असून, त्यासाठी पक्षांतराच्या हालचाली होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मातोश्रीवर नवनिर्वाचित नगरसेवकांना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांनी शिंदे-भाजप युतीवर टीका केली. “पैशाने निष्ठा विकत घेता येत नाही. मराठी माणूस विश्वासघात विसरत नाही,” असा टोला त्यांनी लगावला. शिवसेनेचाच महापौर होईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, सत्ता वाटपाच्या चर्चेत शिंदे गटाने पहिल्या अडीच वर्षांसाठी महापौरपदाची मागणी केली आहे. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटातील नवनिर्वाचित नगरसेवकांना एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षांतराच्या चर्चा फेटाळून लावत एकमताने ‘महायुतीचा महापौर’ निवडला जाईल, असे स्पष्ट केले आहे. महापौर निवडणूक २८ जानेवारी २०२६ रोजी होण्याची शक्यता असून, तोपर्यंत मुंबईच्या राजकारणात घडामोडी वेगाने घडण्याची चिन्हे आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!