Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Navale Bridge Accident : पुण्यातील नवले ब्रिजवर पुन्हा अपघात; 4 ते 5 वाहनांची जोरदार धडक

Navale Bridge Accident : पुण्यातील नवले ब्रिजवर पुन्हा अपघात; 4 ते 5 वाहनांची जोरदार धडक

Navale Bridge Accident : पुण्यातील नवले पुलावर अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाहीये. आज दुपारी पुन्हा नवले ब्रिजवर अपघात झाला. गेल्या आठवड्यात झालेल्या भीषण अपघातातील जखमा ताज्या असतानाच, नव्या अपघातामुळे सर्वांना धक्का बसला आहे. दुपारच्या सुमारास नवले पुलाच्या कुप्रसिद्ध आणि तीव्र उतारावर चार ते पाच वाहनांची टक्कर झाली. अचानक झालेल्या या अपघातामुळे काही काळ परिसरात वाहतूक विस्कळीत झाली.

प्राथमिक माहितीनुसार, या घटनात एक ते दोन जणांना किरकोळ दुखापत झाली असून, त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. सुदैवाने मोठ्या जीवितहानीची पुनरावृत्ती टळली असली, तरी वारंवार घडणाऱ्या दुर्घटनांमुळे स्थानिक नागरिक आणि प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा – नवले ब्रिज परिसरातील वाहतुकीत मोठे बदल; सततच्या अपघातानंतर प्रशासनाची कडक पावले

गेल्या आठवड्यात याच ठिकाणी झालेल्या भीषण अपघातात आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. त्या दुर्घटनेनंतर नवले पुलावरील वाहतूक सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले होते. प्रशासनाकडून उपाययोजनांबाबत आश्वासने देण्यात आली असतानाच, पुन्हा एकदा अपघात होणे हे चिंताजनक आहे.

आजच्या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, वाहनाचा वेग, उतारावरील नियंत्रण, आणि रस्त्यावरील तांत्रिक त्रुटी यांची शक्यता तपासली जात आहे. घटनास्थळी पोलीस आणि वाहतूक विभागाचे पथक पोहोचले असून, अपघाताचे कारण शोधण्यासाठी चौकशी सुरू आहे. वाढत्या दुर्घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!