Today रविवार, 2nd ऑगस्ट 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

नवले ब्रिज परिसरातील वाहतुकीत मोठे बदल; सततच्या अपघातानंतर प्रशासनाची कडक पावले

नवले ब्रिज परिसरातील वाहतुकीत मोठे बदल; सततच्या अपघातानंतर प्रशासनाची कडक पावले

Navale Bridge Accident: पुण्यातील नवले पुल परिसर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, मात्र यावेळी अपघातामुळे नव्हे तर प्रशासनाने घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे. काही दिवसांपूर्वीच या भागात झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला, तर 10 जण जखमी झाले. गेली अनेक वर्षे हा परिसर अपघातांचा धोकादायक झोन म्हणून ओळखला जात असून स्थानिकांमध्ये सतत भीतीचं वातावरण आहे.

अपघातांच्या वाढत्या मालिकेनंतर अखेर प्रशासनाला जाग आली असून नवले ब्रिज परिसरात मोठ्या बदलांची अंमलबजावणी करण्याची घोषणा करण्यात आली आहे. पुलाचा तीव्र उतार आणि वेगवान वाहने ही अपघातांची मुख्य कारणे असल्याचे लक्षात घेत, या भागातील वेगमर्यादा 60 किमी प्रतितासवरून थेट 30 किमी प्रतितास इतकी कमी करण्यात आली आहे. वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्पीड गन्सचा वापर वाढवला जाणार असून नियम मोडणाऱ्या वाहनांवर तत्काळ कारवाई केली जाईल.

हेही वाचा – नवले पूल अपघातात 9 जणांचा मृत्यू; रोहित पवारांकडून शासनाकडे योग्य उपाययोजनांची मागणी

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दुर्घटनास्थळाची पाहणी करून घेतलेल्या बैठकीत या उपाययोजनांना मंजुरी दिली. अवजड वाहनांसाठीही त्यांनी कठोर भूमिका घेतली आहे. पुढील काळात खेड-शिवापूर टोलनाक्यावर प्रत्येक वाहनाचे वजन तपासले जाईल. क्षमतेपेक्षा जास्त भार असलेल्या वाहनांना त्वरित दंड आकारला जाईल आणि ओव्हरलोड कमी करणे बंधनकारक राहील. टोलनाक्यावरच दंडाची प्रक्रिया पूर्ण होणार असल्याने नियम मोडणाऱ्यांना कोणताही दिलासा मिळणार नाही.

याशिवाय, नवले पुलावर अपघात रोखण्यासाठी विशेष चेकपोस्ट उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येथे अवजड वाहनांची तपासणी, ड्रिंक अँड ड्राईव्ह चाचण्या, तसेच इतर सुरक्षाविषयक तपासण्या सातत्याने सुरू राहतील. चालकांना सावध करणे व वाहतूक शिस्त सुधारण्यासाठी प्रत्येक 100 मीटरवर सूचना फलक बसवले जाणार आहेत. या सर्व कडक उपाययोजनांनंतर नवले पुलावरील अपघातांची मालिका थांबणार का, हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. तथापि, स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत प्रशासनाने उचललेले हे पाऊल अत्यंत आवश्यक व योग्य दिशेने टाकलेले मानले जात आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!