Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

अक्खा महाराष्ट्र हळहळला..! राजकारणातील एका युगाचा अंत:, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे विमान अपघातात निधन

अक्खा महाराष्ट्र हळहळला..! राजकारणातील एका युगाचा अंत:, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे विमान अपघातात निधन

बारामती : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांचे आज सकाळी बारामती विमानतळाजवळ झालेल्या भीषण विमान अपघातात निधन झाले. मुंबईहून बारामतीकडे येत असताना खासगी विमान लँडिंगदरम्यान धावपट्टीबाहेर गेले आणि आग लागून कोसळले.

या दुर्घटनेत अजित पवारांसह विमानातील सर्व ६ जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने दिली आहे.अजित पवार बारामतीत जिल्हा परिषद निवडणुकीसाठी चार सभांना संबोधित करण्यासाठी निघाले होते. सकाळी सुमारे ८:४५ ते ९:१५ च्या दरम्यान हा अपघात झाला. विमानात आग लागल्यानंतर स्थानिक प्रशासनाने तात्काळ बचावकार्य सुरू केले, पण आगीची तीव्रता इतकी जास्त होती की कोणालाही वाचवता आले नाही.

राजकीय कारकीर्द आणि योगदान

अजित पवार यांचा जन्म २२ जुलै १९५९ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे झाला. १९८२ मध्ये सहकारी कारखान्याच्या माध्यमातून राजकीय कारकीर्दीला सुरुवात करणाऱ्या अजित पवारांनी १९९१ मध्ये बारामतीतून खासदार म्हणून निवडणूक जिंकली, पण नंतर काका शरद पवार यांच्यासाठी राजीनामा दिला. त्यानंतर ते सलग बारामती विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते.

महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक सहा वेळा उपमुख्यमंत्री पद भूषवण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे.ते जलसंपदा, अर्थ, नियोजन, ऊर्जा यांसारखी प्रमुख खाती सांभाळले. ‘सकाळी ७ वाजता मंत्रालयात हजर होणारा मंत्री’ म्हणून त्यांची शिस्तबद्ध आणि कार्यक्षम ओळख होती. स्पष्टवक्तेपणा आणि जमिनीवरची पकड यामुळे ते ‘दादा’ म्हणून लोकप्रिय होते.

अजित पवार यांच्या पश्चात पत्नी सुनेत्रा पवार आणि मुले पार्थ व जय हे कुटुंब आहे. अपघाताची बातमी मिळताच सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे आणि पार्थ पवार हे दिल्लीहून बारामतीकडे रवाना झाले होते. संपूर्ण महाराष्ट्रात शोकाची लाट पसरली असून, बारामती आणि पुणे परिसरात शांतता आहे.महाराष्ट्राने एक कुशल प्रशासक आणि लोकनेता गमावला आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!