Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

युवक काँग्रेसची ‘यंग इंडिया के बोल’ मोहीम सुरू

युवक काँग्रेसची ‘यंग इंडिया के बोल’ मोहीम सुरू

पुणे : भारतीय युवक काँग्रेसने बेरोजगारीच्या संकटाला वाचा फोडण्यासाठी आणि तरुणांचा आवाज उचलण्यासाठी ‘यंग इंडिया के बोल’ या मोहिमेची घोषणा केली आहे. ही मोहीम भारतीय पातळीवर सुरू असून, पुणे शहरात ही राबविण्यात येत आहे. ही मोहीम १८ ते ३५ वयोगट युवकांसाठी आहे, अशी माहिती पुणे शहर युवक काँग्रेस अध्यक्ष सौरभ अमराळे आणि युवक काँग्रेसचे महाराष्ट्राचे सहप्रभारी एहसान खान यांनी दिली. या पत्रकार परिषदेस पुणे शहर युवक काँग्रेस अध्यक्ष सौरभ अमराळे, युवक काँग्रेस महाराष्ट्र सह प्रभारी एहसान खान, अक्षय जैन, हर्षल हांडे, ऋत्विक घनवट, आनंद दुबे, कुणाल काळे, तुषार पठारे उपस्थित होते.

सौरभ अमराळे म्हणाले, देशातील बेरोजगारी ही एक गंभीर समस्या बनली आहे. भाजप सरकारच्या कार्यकाळात भारताचा बेरोजगारी दर ४५ वर्षांतील सर्वोच्च स्तरावर पोहोचला असून, शहरी तरुणांमध्ये हा दर १६ टक्क्यांच्या पुढे गेला आहे. दर वर्षी १.२ कोटी तरुण रोजगाराच्या शोधात असतात, पण अर्थव्यवस्थेत फक्त निम्म्यालाच नोकऱ्या मिळतात. सरकारने २०१४ मध्ये दोन कोटी नोकऱ्यांचे आश्वासन दिले होते, पण आज तरुणांकडे रोजगारपत्रांऐवजी व्हॉट्सअॅप फॉरवर्ड्स आहेत. ‘यंग इंडिया के बोल’ या मोहिमेद्वारे तरुणांना सक्षम करणे आणि सरकारला जबाबदारीसाठी प्रवृत्त करणे हा आमचा उद्देश आहे. युवक काँग्रेस तरुणांच्या पाठीशी ठाम उभी असून रोजगार आणि सन्मानासाठी संघर्ष करणार आहे, असेही अमराळे म्हणाले.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!