Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पुणे-नाशिक महामार्ग २२ तास रोखला, २५० जणांविरोधात गुन्हा

पुणे-नाशिक महामार्ग २२ तास रोखला, २५० जणांविरोधात गुन्हा

पुणे : शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे बिबट्याच्या हल्ल्यात रोहन बोंबे या मुलाचा मृत्यू झाल्याने संतापलेल्या नागरिकांनी मंचर येथे पुणे-नाशिक महामार्ग २२ तास रोखून धरला. वन विभागाच्या निष्क्रियतेला आणि बिबट्या हल्ले रोखण्यात अपयशाला कंटाळून “बिबट्या मुक्त परिसर”च्या मागणीसाठी हे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली.

आंदोलनात देवदत्त निकम, सुरेश भोर, अरुण गिरे यांच्यासह सुमारे २५० जण सहभागी होते. मंचर पोलिसांनी बेकायदेशीर जमाव जमवणे, रास्तारोको करणे आणि सार्वजनिक कार्यात अडथळा निर्माण केल्याच्या कलमांतर्गत या सर्वांवर गुन्हा दाखल केला आहे.

गेल्या २० दिवसांत पिंपरखेड आणि जांबुत परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात तीन जणांचा बळी गेला आहे. वन विभागाकडून ठोस उपाययोजना न झाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.

दरम्यान, ४ नोव्हेंबर २०२५ रोजी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना पिंपरखेड येथील नरभक्षक बिबट्याला ठार मारण्यात यश मिळालं आहे. गेल्या २३ वर्षांमध्ये दोन वेळा परवानग्या मिळूनही नरभक्षक बिबट्याला मारण्यात वन विभागाच्या अधिकाऱ्यांना यश मिळालं नव्हतं, पण आज प्रथमच हे यश मिळताना पाहून समाधान वाटतंय, असं माजी मंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!