Today गुरूवार, 17th सप्टेंबर 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Shalinitai Patil Death: राजकारणातील ‘वाघीण’ काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ काँग्रेस नेत्या शालिनीताई पाटील यांचं निधन

Shalinitai Patil Death: राजकारणातील ‘वाघीण’ काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ काँग्रेस नेत्या शालिनीताई पाटील यांचं निधन

Shalinitai Patil Death: महाराष्ट्राच्या राजकारणातील एक कणखर नेतृत्व आणि माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनीताई पाटील यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले. मुंबईतील माहीम येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही महिन्यांपासून त्या वृद्धत्वामुळे उद्भवलेल्या आजारांशी झुंज देत होत्या.

राजकीय कारकीर्द

शालिनीताईंचा राजकीय प्रवास अत्यंत प्रेरणादायी आणि तितकाच चर्चेचा राहिला. केवळ वसंतदादांच्या पत्नी ही ओळख पुसून त्यांनी स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले होते. त्यांनी सांगली लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. तसेच, सातारा जिल्ह्यातील कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून १९९९ ते २००९ या काळात त्या सलग आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. १९८० च्या दशकात त्यांनी राज्य मंत्रिमंडळात महत्त्वाची मंत्रिपदे भूषवली होती.

हेही वाचा – Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचा काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बड्या नेत्याने घेतलं धनुष्यबाण हाती

खंबीर आणि करारी व्यक्तिमत्व

शालिनीताई पाटील या त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जात. १९८१ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांना राजीनामा देण्यास भाग पाडण्यामागे त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते. राजकीय चढ-उतारात त्यांनी अनेकदा पक्षांतर केले किंवा अपक्ष निवडणुका लढवल्या, मात्र त्यांनी आपली विचारधारा कधीच सोडली नाही.

कोरेगावमध्ये होणार अंत्यसंस्कार

शालिनीताईंच्या निधनामुळे काँग्रेससह संपूर्ण राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे. त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी, सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथे नेण्यात येणार असून, तिथेच त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडणार आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!