Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Devendra Fadnavis: ‘घरगुती गॅसचा कोणताही तुटवडा नसून, काँग्रेस पक्ष जाणीवपूर्वक…’; देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर निशाणा

Devendra Fadnavis: ‘घरगुती गॅसचा कोणताही तुटवडा नसून, काँग्रेस पक्ष जाणीवपूर्वक…’; देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर निशाणा

LPG Gas Shortage Rumors: “देशात घरगुती गॅसचा कोणताही तुटवडा नसून, काँग्रेस पक्ष जाणीवपूर्वक भीतीचे वातावरण निर्माण करत आहे,” असा हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. भद्रावती येथे विविध विकासकामांच्या भूमिपूजन समारंभात ते बोलत होते. गॅसचा पुरवठा पूर्णपणे सुरळीत असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवून विनाकारण रांगा लावून संभ्रमात पडू नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. ऑनलाइन बुकिंगद्वारे गॅस वेळेत उपलब्ध होत असतानाही लोकांमध्ये अराजकता निर्माण करणे ही काँग्रेसची विघातक बुद्धी असल्याचे त्यांनी नमूद केले.

विदर्भात ‘ग्रीन स्टील’ची क्रांती; १० हजार जणांना रोजगार
विदर्भाच्या औद्योगिक विकासावर भाष्य करताना फडणवीस यांनी भद्रावती येथील आगामी प्रकल्पांची महत्त्वपूर्ण माहिती दिली. या भागात दोन मोठ्या प्रकल्पांच्या माध्यमातून ३०,००० कोटी रुपयांची भव्य गुंतवणूक होणार असून, यामुळे सुमारे १०,००० तरुणांना प्रत्यक्ष रोजगाराची संधी उपलब्ध होईल. विशेष म्हणजे, ‘कोल गॅसिफिकेशन’ तंत्रज्ञानाचा वापर करून येथे ‘ग्रीन स्टील’ बनवले जाईल. पर्यावरणपूरक पद्धतीने तयार होणाऱ्या या स्टीलला जागतिक स्तरावर मोठी मागणी असून, भारताला या क्षेत्रात जागतिक केंद्र बनवण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले.

देशाला ‘आत्मनिर्भर’ बनवण्यासाठी विदर्भाचे पाऊल
भद्रावती येथे उभारला जाणारा हा प्रकल्प देशातील अशा प्रकारचा पहिलाच प्लांट ठरणार असून त्याचा पहिला टप्पा पुढील दोन वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. सध्या कार्बन कॅप्चरिंग आणि आवश्यक केमिकल्ससाठी भारताला मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून राहावे लागते. मात्र, या प्रकल्पामुळे हे सर्व घटक आता भारतातच तयार होतील, ज्यामुळे परकीय चलनाची बचत होईल. देशाची ऊर्जा सुरक्षा बळकट करण्यासाठी विदर्भाचे हे योगदान मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!