Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

झरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मंजुश्री मुसळे यांची बिनविरोध निवड

झरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मंजुश्री मुसळे यांची बिनविरोध निवड

करमाळा: करमाळा तालुक्यातील झरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी माजी आमदार संजय शिंदे गटाच्या मंजुश्री मयूर मुसळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. आपसात ठरल्याप्रमाणे मैना पोपट घाडगे यांनी आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर निवडणूक घेऊन मुसळे यांची निवड करण्यात आली.

बुधावारी सरपंच निवड प्रक्रिया घेण्यात आली. सकाळी अकरा ते बारा वाजेपर्यंत अर्ज स्वीकारण्यात आले. यावेळी अकरा सदस्यांपैकी सात सदस्य हजर होते. माजी आमदार संजय शिंदे गटाच्या मंजुश्री मुसळे यांचा सरपंचपदासाठी एकमेव अर्ज आल्याने त्यांची सरपंचपदी निवड झाल्याची घोषणा दुपारी दोन वाजता निवडणूक अधिकारी भंडारे यांनी केली. निवड जाहीर होताच समर्थकांनी फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी ग्रामसेवक भुजबळ हे देखील उपस्थित होते.

या निवडीनंतर पॅनल प्रमुख प्रशांत पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी नूतन सरपंच मुसळे यांचे अभिनंदन केले. यावेळी भीमराव घाडगे, बबन घाडगे, हनुमंत पाटील, सुनीता पाटील, पोपट घाडगे, सुरेश पाटील, संजय कांबळे, बाबासाहेब सरोदे , दिलीप कांबळे, सुदाम सरोदे, मनोज गरड, रामदास गायकवाड, अनिल मिटे, विजय माने, बाबासाहेब घाडगे, सोमनाथ घाडगे, बाळासाहेब घाडगे, किशोर पाटील, मयुर मुसळे, अशोक घाडगे, बंडू बोराटे, दिपक बोराटे, प्रदीप मिटे, बापू होनराव, संतोष मुरूमकर, संतोष शिंदे, अमोल मुसळे, प्रदीप घाडगे व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!