Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

मुलांना जिल्हा परिषद शाळेत पाठवल्यास घरपट्टी माफ होणार; सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निर्णयाचं होतंय कौतुक

मुलांना जिल्हा परिषद शाळेत पाठवल्यास घरपट्टी माफ होणार; सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निर्णयाचं होतंय कौतुक

सांगोला (सोलापूर): येत्या १५ जूनपासून सुरू होणाऱ्या नवीन शैक्षणिक वर्षापासून जे पालक आपल्या पाल्याचा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रवेश घेतील. अशा मालमत्ताधारकांची संपूर्ण घरपट्टी माफ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जवळा (ता. सांगोला) ग्रामपंचायतीने ग्रामसभेत ठरावाद्वारे घेतला आहे. या निर्णयाचे सोलापूर जिल्ह्यासह सांगोला तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी अनुकरण करावे, जिल्हा परिषद शाळांना प्रोत्साहन यावे, असे आवाहन माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांनी केले आहे.

ग्रामीण भागांतील सध्याच्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये उपेक्षित, वंचित, दलित, गरिबांची मुले शिक्षण घेत आहेत. परंतु, शिक्षणात ही स्पर्धा लागल्यामुळे आपल्या मुलांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी पाल्यांचा ओढा खासगी शाळांकडे वाढत आहे. यामुळे दिवसेंदिवस जिल्हा परिषद शाळांना घरघर लागली आहे. त्यामुळे शिक्षण विभागाकडून पटसंख्येअभावी गाव, वाडी-वस्ती, दलित वस्तीतील शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अशीच परिस्थिती पुढे चालू राहिल्यास जिल्हा परिषद शाळा बंद होतात की काय, अशीही भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे जवळा ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत ग्रामस्थांच्या सहमतीने एकमुखी ठराव घेऊन पाल्यांना जिल्हा परिषद शाळेत प्रवेश येतील, अशा मालमत्ताधारकांची संपूर्ण घरपट्टी माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.

तत्कालीन ग्रामविकास मंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांनी ग्रामस्तरावर धाडसी निर्णय घेऊन आपल्या कामकाजाची चूणक दाखवली होती. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे ग्रामविकास खात्याचा सक्षमपणे कारभार चालवीत आहेत. त्यांच्या रूपाने ग्रामविकास खात्याला सक्षम नेतृत्व मिळाले आहे. त्यांच्या विचाराला अधिक बळकटीकरण करण्यासाठी जवळा ग्रामपंचायतीचा आदर्शवादी प्रयत्न निश्चितपणाने सोलापूर जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायत समोर प्रेरणादायी ठरेल, असा विश्वासही साळुंखे-पाटील यांनी व्यक्त केला.

66 जिल्हा परिषद शाळा वाचल्या पाहिजेत. शाळांचा दर्जा सुधारून विद्यार्थी व पालकांचा कल वाढला पाहिजे. हा हेतू डोळ्यासमोर ठेवून जवळा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आदर्शवादी उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

-दीपकसाळुंखे-पाटील, माजी आमदार

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!