Today बुधवार, 5th ऑगस्ट 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

RBI Repo Rate: खुशखबर! आरबीआयकडून रेपो दरात कपात; गृह, कार आणि वैयक्तिक कर्जे होणार स्वस्त

RBI Repo Rate: खुशखबर! आरबीआयकडून रेपो दरात कपात; गृह, कार आणि वैयक्तिक कर्जे होणार स्वस्त

RBI Repo Rate: भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) शुक्रवारी लाखो कर्जदारांना दिलासा देणारा मोठा निर्णय जाहीर केला. वाढत्या खर्चासोबत ईएमआय कमी होण्याची अपेक्षा करणाऱ्या ग्राहकांना आरबीआयच्या ताज्या धोरणाचा थेट फायदा होणार आहे. चलनविषयक धोरण समितीच्या (एमपीसी) तीन दिवसांच्या बैठकीनंतर, आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी रेपो दरात ०.२५ टक्के कपात जाहीर करत तो ५.२५ टकक्यांवर आणल्याचे सांगितले.

आर्थिक परिस्थितीचा सखोल आढावा

दरम्यान, ३ ते ५ डिसेंबरदरम्यान झालेल्या बैठकीत देशांतर्गत महागाई, जागतिक आर्थिक घडामोडी, मागणीची स्थिती आणि महागाईतील सततची घट या सर्व घटकांचा विचार करण्यात आला. सर्व सदस्यांनी एकमताने रेपो दर कमी करण्यास मान्यता दिली. भारताची अर्थव्यवस्था सध्या मजबूत स्थितीत आहे. दुसऱ्या तिमाहीत जीडीपी ८.२ टक्यांनी वाढला, तर ऑक्टोबर २०२५ मध्ये किरकोळ महागाई ०.२५ टक्के इतक्या ऐतिहासिक नीचांकावर होती. या सकारात्मक आकडेवारीमुळे आरबीआयला व्याजदर कपातीची मोकळीक मिळाली.

हेही वाचा – कोरोना IPO येतोय; पुढच्या आठवड्यात होणार लाँच, मार्केटमध्ये एकच चर्चा

कर्जदारांना लाभ, ईएमआयमध्ये घट

रेपो दर कमी झाल्यामुळे बँका आरबीआयकडून स्वस्तात कर्ज घेऊ शकतील. त्याचा थेट परिणाम पुढीलप्रमाणे दिसेल:

  • गृहकर्जाच्या ईएमआयमध्ये घट
  • वाहन कर्जे स्वस्त
  • वैयक्तिक कर्जांवरील व्याजदरातही सवलतीची शक्यता

या निर्णयामुळे सणांनंतर ग्राहकांच्या खर्चावर लक्षणीय परिणाम होऊ शकतो आणि त्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळू शकतो.

हेही वाचा – शेअर मार्केटमध्ये चढउतार कायम; ‘या’ स्टॉकच्या किमतीत झाली मोठी घसरण

तटस्थ भूमिका कायम

एमपीसीने आपल्या धोरणामध्ये तटस्थ भूमिका कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ महागाई नियंत्रण आणि आर्थिक वाढ यांच्यात संतुलन राखणे हे आरबीआयचे प्रमुख उद्दिष्ट असेल.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!