Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Harivansh Narayan: राज्यसभेच्या उपसभापतीपदी हरिवंश नारायण यांची फेरनिवड; मोदींकडून कौतुकाचा वर्षाव

Harivansh Narayan: राज्यसभेच्या उपसभापतीपदी हरिवंश नारायण यांची फेरनिवड; मोदींकडून कौतुकाचा वर्षाव

Harivansh Narayan: राज्यसभेच्या उपसभापतीपदी हरिवंश नारायण यांची सलग 3 यांदा बहुमताने निवड झाली आहे. त्यांच्या या ऐतिहासिक निवडीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहात त्यांचे विशेष कौतुक केले. “सलग 3 वेळा या महत्त्वाच्या पदाची जबाबदारी मिळणे, हा संपूर्ण सभागृहाचा हरिवंशजींच्या कार्यपद्धतीवर असलेला अगाध विश्वास अधोरेखित करतो,” अशा शब्दांत पंतप्रधानांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला.

चंद्रशेखरजींच्या आठवणींना उजाळा
विशेष योगायोग म्हणजे, 17 एप्रिल रोजी माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांची जयंती असतानाच हरिवंशजींची निवड झाली. याचा संदर्भ देत मोदी म्हणाले की, हरिवंशजींचे चंद्रशेखरजींशी अत्यंत जिव्हाळ्याचे ऋणानुबंध होते. त्यांनी केवळ चंद्रशेखरजींसोबत काम केले नाही, तर त्यांच्या जीवनप्रवासावर पुस्तके लिहून त्यांचे विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे मोठे कार्य केले आहे.

लेखणी भेदक, पण स्वभाव शांत
हरिवंश नारायण यांच्या प्रदीर्घ पत्रकारितेच्या अनुभवाचा उल्लेख करताना पंतप्रधान म्हणाले की, पत्रकारिता क्षेत्रातील त्यांचा दांडगा अनुभव सभागृहाचे कामकाज चालवताना अत्यंत मोलाचा ठरत आहे. त्यांची लेखणी जितकी टोकदार आणि भेदक आहे, तितकीच त्यांची बोलण्याची पद्धत शांत, संयत आणि सर्वांना सोबत घेऊन चालणारी आहे. जयप्रकाश नारायण यांच्या गावात जन्मलेले आणि काशीमध्ये शिक्षण घेतलेले हरिवंशजी आजही आपल्या ग्रामीण मुळांशी घट्ट जोडलेले आहेत, असेही पंतप्रधानांनी आवर्जून नमूद केले.

सभागृहाची प्रतिष्ठा वाढवणारे व्यक्तिमत्व
राज्यसभेचे कामकाज शिस्तबद्ध आणि कार्यक्षमतेने पार पाडण्यात हरिवंशजींची भूमिका कळीची राहिली आहे. उच्च व्यावसायिक मानके आणि नैतिक मूल्ये जपणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख सर्वपक्षीय खासदारांमध्ये आहे. त्यांच्या या नवीन कार्यकाळामुळे सभागृहाच्या प्रतिष्ठेत अधिक भर पडेल, असा विश्वास यावेळी पंतप्रधानांनी व्यक्त केला. त्यांच्या या निवडीचे सभागृहातील सर्व सदस्यांनी स्वागत केले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!