नवी दिल्ली: अंतराळवीर सुनीता विल्यम्स या नऊ महिने अंतराळात राहिल्यानंतर सुरक्षितपणे पृथ्वीवर परत आल्या आहेत. भारतीय वेळेनुसार पहाटे ३.३० च्या सुमारास विल्यम्स यांचे स्पेस कॅप्सूल मेक्सिकोच्या आखातात उतरले. सुनीता विल्यम्स व त्यांचे सहकारी बुच विल्मोर हे दोघे फक्त आठ दिवसांच्या अंतराळ मोहिमेसाठी गेले होते. आंतरराष्ट्रीय आंतराळ स्थानकात आठ दिवसांमध्ये संशोधन करून दोघेही पृथीवर परतणार होते. मात्र, त्यांच्या बोईंग स्टारलायनर या स्पेसक्राफ्टमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे त्यांना २८६ दिवस आंतरराष्ट्रीय आंतराळ स्थानकातच अडकून पडावे लागले.
दरम्यान, सुनीता विल्यम्स आणि बूच विल्मोर यांना परत आणण्यासाठी नासाने स्पेसएक्स या खासगी आंतराळ संशोधन कंपनीच्या मदतीने एक मोहीम आखली. त्यानुसार स्पेसएक्सच्या अवकाशयानाने १४ मार्च रोजी दोघांना परत आणण्यासाठी उड्डाण केलं आणि आज (दि.१९) पहाटे ते यान दोन्ही अंतराळवीरांना घेऊन पृथीवर परतले आहे. परंतु, सुनीता विल्यम्स यांचा परतीचा प्रवास हा काही वाटतो तितका सोपा नव्हता.
बुच विल्मोर आणि सुनीता विल्यम्स नऊ महिन्यांनी पृथ्वीवर परत आले आहेत. त्याचे स्पेसएक्स कॅप्सूल फ्लोरिडा बेमध्ये पॅराशूटद्वारे सुरक्षितपणे उतरले. ज्याला एक मोठी उपलब्धी म्हणून पाहिले जात आहे. तथापि, यशाच्या या क्षणांमध्ये, एक वेळ अशी आली, जेव्हा लोक काळजीत पडले होते. याच वेळी मिशन नियंत्रकांचा अंतराळवीरांना परत आणणाऱ्या क्रू ड्रॅगन कॅप्सूलशी संपर्क तुटला. यावेळी, संपूर्ण मोहिमेशी संबंधित लोक श्वास रोखून धरला होता.
तथापि, अवघ्या सात मिनिटांनी बुधवारी पहाटे ३:२० वाजता अंतराळयानाशी संपर्क पूर्ववत झाला. परंतु पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करणाऱ्या कोणत्याही अंतराळ यानासाठी हा सात मिनिटांचा ब्लॅकआउट कालावधी खूप महत्त्वाचा असतो. या काळात, तापमान सामान्यपेक्षा खूप जास्त असल्याने अंतराळयान कोसळण्याची शक्यता वाढते.
विमानाशी संपर्क तुटण्याचे कारण काय होते? कल्पना चावलाच्या परतीच्या मोहिमेदरम्यान हा अपघात का झाला ते जाणून घेऊया.
स्पेसएक्सच्या केट टाईस यांच्या मते, जेव्हा अंतराळयान पृथ्वीच्या दाट वातावरणात प्रवेश करते तेव्हा तीव्र दाब आणि घर्षण निर्माण होते, ज्यामुळे विमानाचा बाह्य भाग ३,५०० अंश फॅरेनहाइट म्हणजेच सुमारे १९२६ अंश सेल्सिअस पर्यंत गरम होतो. उष्णतेमुळे कॅप्सूलच्या बाहेर प्लाझ्मा जमा होतो, ज्यामुळे १० मिनिटांपर्यंत संवादात व्यत्यय येऊ शकतो.
“ब्लॅकआउटचा अचूक कालावधी” मोहिमेवर अवलंबून असतो, असे टायस म्हणाले. “पण प्रत्येक ड्रॅगन कॅप्सूलमध्ये असे घडते, कारण ते वातावरणात परत येत असताना प्लाझ्मा जमा होतो.”
२०२३ मध्ये स्पेसएक्सच्या CEW-6 मोहिमेचे पायलट असलेले नासाचे अंतराळवीर वुडी होबर्ग म्हणाले की, अंतराळयानावरील अंतराळवीर या क्षणाची वाट पाहत होते. ते पूर्णपणे शांत राहतील. होबर्ग यांनी सीएनएनला सांगितले की, वातावरणात पुन्हा प्रवेश केल्याने ड्रॅगन कॅप्सूलचा आतील भाग थंड होतो. हे पाऊल, अंतराळयानाच्या बाहेरील बाजूस असलेल्या संरक्षक उष्णतेच्या कवचासह एकत्रित केल्याने, प्रवाशांना सामान्य तापमानात ठेवता येते.
काय आहे ‘कम्युनिकेशन ब्लॅकआउट’?
जेव्हा एखादे अंतराळयान अवकाशातून पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करते, तेव्हा त्याचा वेग सुमारे २८,००० किमी/तास असतो. इतक्या वेगाने जाताना, अंतराळयानाचे वातावरणाशी घर्षण होते, ज्यामुळे त्याचे तापमान वेगाने वाढते. अति उष्णतेमुळे अंतराळयान कोसळण्याचा धोका वाढतो. या काळात, अंतराळयान आणि मोहिमेच्या नियंत्रणामधील सिग्नल तुटतो, ज्याला कम्युनिकेशन ब्लॅकआउट म्हणतात. काही मिनिटांसाठी अंतराळयानाशी कोणताही संपर्क होत नाही, ज्यामुळे हा काळ अत्यंत संवेदनशील बनतो.
तथापि, या आव्हानावर मात करत, सुनीता विल्यम्सला पृथ्वीवर परत आणणारे अंतराळयान समुद्रात यशस्वीरित्या उतरले. यानंतर चारही अंतराळवीरांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. अशाप्रकारे, २८६ दिवस अंतराळात घालवल्यानंतर, सुनीता विल्यम्स आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुन्हा एकदा पृथ्वीच्या ताज्या हवेत श्वास घेतला.


