Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

बीड येथील खुनातील मास्टरमाइंडला सोडणार नाही: अजित पवार; बारामतीत अजित पवारांचा जल्लोषात नागरी सत्कार

बीड येथील खुनातील मास्टरमाइंडला सोडणार नाही: अजित पवार; बारामतीत अजित पवारांचा जल्लोषात नागरी सत्कार

बारामती: बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करणाऱ्याची न्यायालयीन चौकशी केली जाईल. मास्टरमाइंडला सोडणार नाही, अशा अमानुष लोकांना फाशीची शिक्षा झाल्याशिवाय सोडणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नागरी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पक्ष निरीक्षक सुरेश पालवे आदी मान्यवर उपस्थित होते.

पवार म्हणाले, बारामतीकरांनी दिलेल्या मताधिक्याने विधानसभेत गेल्यावर छाती गर्वाने फुगते. मी राज्यातील जनतेला शब्द देतो की, ध्येयधोरणांची प्रतारणा करणार नाही, सर्वधर्मसमभाव असे वागणार आहे. यासाठी राष्ट्रवादी पक्ष वाटचाल करेल, संघर्ष करणे त्यासाठी लढणे हे राष्ट्रवादीचे धोरण आहे. बारामतीच्या विकास हाच आमचा ध्यास आहे. आजपर्यंत बारामती राज्यातील एक नंबर होती. आता आपल्याला देशात एक नंबर करायची आहे, असे सांगत विरोधकांकडून नरेटीव सेट केला जातोय. मात्र मी आपणास शब्द देतो जोपर्यंत चंद्र, सूर्य आहे तोपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान बदलणार नाही.

लोकसभेला फटका बसल्यावर आम्ही ईव्हीएमला दोष दिला नाही, लाडकी बहीण योजना महिलांमध्ये प्रसिद्ध झाली, लाइट बिल माफ केले, विरोधकांनी यावर टीका केली. विधानसभेचा निकाल महाविकास आघाडीला पचला नाही आणि ईव्हीएमच्या नावाने टीका सुरू केली, बारामतीकरांनी विधानसभेला मला जे मताधिक्य दिले, त्यामुळे जबाबदारी वाढली आहे. कामाच्या बाबतीत मी कटिबद्ध राहीन, अशी ग्वाही देतो, असे पवार यांनी स्पष्ट केले.

प्रत्येकाने जबाबदारी उचलली पाहिजे

प्रत्येकाने जबाबदारी उचलली पाहिजे. एकटा २४ तास राबून उपयोग नाही. मी तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही, केंद्राची तीन कोटी घरांची योजना असून त्यातील दहा टक्के घरे राज्यात आणणार आहे. बेघरांना घर देण्याची आमची संकल्पना आहे. तालुक्यात पाण्याच्या बाबतीत मी कोणाला वंचित ठेवणार नाही. बंद पाइपलाइनला विरोध करू नका, असे आवाहन त्यांनी केले.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!