Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

एकनाथ शिंदे पुन्हा गावाकडे; नाराजीच्या चर्चाचे पेव फुटले

एकनाथ शिंदे पुन्हा गावाकडे; नाराजीच्या चर्चाचे पेव फुटले

सातारा: महायुती सरकारमधील खाते वाटपातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाराजी अजूनही उघड होत आहे. त्यांना मुख्यमंत्री, गृहमंत्रीपद न मिळाल्याने त्यांचा चेहरा अद्यापही उतरलेलाच दिसत आहे. ते रविवारी अचानक महाबळेश्वर तालुक्यातील दरे गावी परतले आहेत.

राज्यात महायुती सरकार बहुमताने सतेत आले. त्यात भाजपचा वरचष्मा राहिला. त्यामुळे महायुतीत मुख्यमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाणार, असे स्पष्ट झाले. त्यापासून एकनाथ शिंदे यांची नाराजी वाढली आहे. मुख्यमंत्रीपद गेले तरीही त्यांना गृहमंत्रीपद हवे असल्याची चर्चा सुरू होती. मात्र ते मिळत नसल्याने त्यांची नाराजी वाढली होती. यादरम्यान त्यांनी दरे गावची वाट पकडली होती. नोव्हेंबरअखेरीस तब्येत बिघडल्याने ते विश्रांतीसाठी दरे गावी आले होते. तब्येत ठीक झाल्यानंतर पुन्हा ते मुंबईला परतले. मात्र या घडामोडींमुळे सत्तास्थापनेला विलंब झाला होता.

महायुती सरकारमध्ये शनिवारी रात्री खातेवाटप झाले. यात उपमुख्यमंत्री शिंदे यांना नगरविकास, गृहनिर्माण व सार्वजनिक बांधकाम विभाग ही खाती मिळाली आहेत. शिवाय अनेक आमदारांना खाती न मिळाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त करणे सुरू केले आहे. त्यांना एकनाथ शिंदे यांनी ‘श्रद्धा व सबुरी’चा सल्ला दिला आहे. दुसरीकडे मात्र अचानक त्यांनी आपल्या दरे या गावी येणे पसंत केले आहे. रविवारी सायंकाळी ५ वाजता हेलिकॉप्टरने ते व खा. श्रीकांत शिंदे दरे गावी दाखल झाले. त्यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांनी बोलणे टाळणे. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरील नाराजी दिसून येत होती.

प्रसन्न… नाराज..

एकनाथ शिंदे हे दरे या मूळ गावी येतात तेव्हा त्यांचा चेहरा नेहमीच प्रसन्न पाहण्यास मिळतो. दरवर्षी ते वेळात वेळ काढून गावी येतातच. सध्या त्यांचे गावी येणे वाढले आहे. मुख्यमंत्री झाल्यानतरही ते सातत्याने गावी आले होते. आता पुन्हा सतेत आल्यानंतरही ते गावी आले. मात्र, या दोन्हीही वेळी त्यांच्या चेहऱ्यावरील नाराजी स्पष्ट जाणवत होती.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!