Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

BJP Internal Conflict: नाशिकमध्ये भाजपच्या दोन गटांत राडा; अर्ज मागे घेताना उमेदवारावर हल्ला, सिडको कार्यालयात गोंधळ

BJP Internal Conflict: नाशिकमध्ये भाजपच्या दोन गटांत राडा; अर्ज मागे घेताना उमेदवारावर हल्ला, सिडको कार्यालयात गोंधळ

BJP Internal Conflict: महापालिका निवडणुकीच्या अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी नाशिकमध्ये भाजपमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. प्रभाग ३१ (ड) मधील भाजपचे उमेदवार बाळकृष्ण शिरसाट आणि देवानंद बिरारी यांच्या समर्थकांमध्ये विभागीय कार्यालयातच जोरदार राडा झाला. बिरारी यांनी आपल्या पत्नीसह कार्यालयात प्रवेश केला असता, प्रतिस्पर्धी उमेदवाराने त्यांच्यावर हल्ला केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.

नेमकं प्रकरण काय?

देवानंद बिरारी यांचा आरोप आहे की, अर्ज प्रक्रियेसाठी गेले असताना त्यांच्यावर आणि त्यांच्या पत्नीवर अचानक हल्ला करण्यात आला. या प्रकारामुळे सिडको विभागीय कार्यालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. बिरारी यांच्या पत्नीने या घटनेनंतर माध्यमांसमोर येत आपला संताप व्यक्त केला आणि शिरसाट यांना कोणीही मतदान करू नये, असे आवाहन करत मतदारांना साद घातली.

हेही वीचा – Nagpur Politics: नागपुरात मोठे राजकीय नाट्य! उमेदवारी मागे घेऊ नये म्हणून समर्थकांनी बंडखोर नेत्यालाच घरात कोंडले

दुसरीकडे, बाळकृष्ण शिरसाट यांनी मात्र असा कोणताही वाद किंवा हल्ला झाला नसल्याचे सांगत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. या गोंधळानंतर पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत दोन्ही गटांना कार्यालयाबाहेर काढले. नाशिकमधील या ‘हायव्होल्टेज’ ड्राम्यामुळे महापालिकेची ही लढाई अत्यंत चुरशीची आणि संघर्षाची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!