Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

आधी वादग्रस्त वक्तव्य…. नंतर पक्षाच्या बैठकीला दांडी, अजितदादा आमदारावर संतापले! संग्राम जगतापांचं नेमकं चाललंय काय?

आधी वादग्रस्त वक्तव्य…. नंतर पक्षाच्या बैठकीला दांडी, अजितदादा आमदारावर संतापले! संग्राम जगतापांचं नेमकं चाललंय काय?

मुंबई: सत्तेत असलेल्या अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीमध्ये सध्या काही सगळं आलबेल नसल्याचे चित्र आहे. अजित पवारांचे पक्षातील जुने सहकारी नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु सुरू आहे. तर, दुसरीकडे अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांच्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची डोकेदुखी वाढली आहे. पक्षाच्या बैठकीत अजित पवारांनी बोलावूनही आमदार जगताप यांनी बैठकीला दांडी मारली आहे. त्यामुळे संग्राम जगताप यांचे नेमकं काय सुरु आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे पक्षाच्या धर्मनिरपेक्ष भूमिकेचा पुनरुच्चार करताना दिसत आहेत. मात्र, त्यांच्या पक्षातील एका आमदाराच्या वादग्रस्त कृतीमुळे त्याच्या डोक्याला ताप वाढला आहे. आमदार संग्राम जगताप यांच्या वक्तव्यामुळे आता पक्षांतर्गत नाराजीचे वातावरण तयार झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. २४) पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नियमित बैठकीला आमदार संग्राम जगताप अनुपस्थित राहिले. त्यांच्या गैरहजेरीबाबत पवार यांनी बैठकीत थेट नाराजी व्यक्त केली. त्यानंतर त्यांनी उपस्थित आमदारांसमोर जगताप यांनी केलेल्या विधानांवरही नाराजी व्यक्त करत, अशा कृती पक्ष सहन करणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले.

उपमुख्यमंत्री पवार यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “राष्ट्रवादी काँग्रेस हा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. अशा पक्षात राहून जर कोणी आमदार धार्मिक ध्रुवीकरणाला चालना देणारी किंवा आक्षेपार्ह विधाने करत असेल, तर ती पक्षाच्या धोरणाविरोधात गोष्ट असल्याचे पवारांनी म्हटले. पक्षाच्या प्रतिमेवर परिणाम करणाऱ्या अशा विधानांबाबत पवार स्वतः आमदार जगताप यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहितीही त्यांनी उपस्थित आमदारांना दिली.

दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून आमदार संग्राम जगताप यांच्याकडून अल्पसंख्याक समुदायाबाबत आक्षेपार्ह विधाने असल्याचे दिसून येत आहे. संग्राम जगताप यांनी काही दिवसांपूर्वी एका जाहीर भाषणात केलेल्या वक्तव्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!