करमाळा: तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे बिगुल वाजले अन् लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर तालुक्यात परत एकदा निवडणुकीचे वारे वाहू लागले. बागल गट, जगताप गट, पाटील गट, शिंदे गट व आता नव्याने तालुक्याच्या राजकारणात पाय रोवू पाहणारा झोळ गट, आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीत एकमेकांसमोर उभे ठाकले होते. परंतु, कारखान्याच्या निवडणूकीतून बागल गट व जगताप गट यांनी अचानक माघार घेतल्याचे जाहीर केले. आता ही निवडणूक आमदार पाटील, माही आमदार शिंदे व झोळ गटातच होणार हे जवळपास निश्चित झाले आहे.
जगताप व बागल गटाने निवडणूकीतून माघार घेतल्यानंतर 1 एप्रिल रोजी 272 उमेदवारी अर्जांमधून फक्त दोन्ही गटाच्या एकुण 22 उमेदवारांनी त्यांचे उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. तर 2 एप्रिल हा अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे, उर्वरित 250 उमेदवारी अर्जांपैकी किती जण माघार घेणार? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.


