Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

‘राष्ट्रवादी पक्ष द्वेषाने काम करतो, त्यांची कार्यपद्धती आम्हाला मान्य नाही’; हर्षवर्धन पाटीलांची टीका

‘राष्ट्रवादी पक्ष द्वेषाने काम करतो, त्यांची कार्यपद्धती आम्हाला मान्य नाही’; हर्षवर्धन पाटीलांची टीका

Indapur Election: इंदापूर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण चांगलेचं तापले आहे. या निवडणुकीत भाजप नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी महायुतीतीलच घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी (अजित पवार गट)वर ताशेरे ओढले आहेत. इंदापूरमध्ये आम्ही राष्ट्रवादीच्या वृत्तीविरोधात उभे आहोत. त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीला आम्ही मान्यता देऊ शकत नाही, असा स्पष्ट दावा पाटील यांनी केला.

अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यातील संघर्ष जुना असला तरी, नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तो आणखी चिघळलेला पाहायला मिळत आहे. इंदापूरमध्ये उमेदवार नसतानाही उपमुख्यमंत्री अजित पवारांनी माझ्यावर टीका का केली? आमची चूक नेमकी काय? असा प्रश्नही पाटील यांनी उपस्थित केला.

अजित पवारांच्या टीकेला हर्षवर्धन पाटील यांचे प्रत्युत्तर

इंदापूरमधील सभेत अजित पवारांनी विकासकामांवरून भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्यावर हल्ला चढवला होता. यावर पलटवार करताना पाटील म्हणाले, अजित पवारांनी टीका केली, पण यावेळी त्यांनाच पराभव पत्करावा लागेल. जनता कोणाच्या कामावर खूश आहे, हे मतदानातून समोर येईल.

हेही वाचा – विकासासाठी सकारात्मक नवीन दृष्टी असणाऱ्या उमेदवारांच्या बाजूने कौल द्यावा; उपमुख्यमंत्री अजित पवारांची इंदापूरकरांना भावनिक साद

अजित पवारांनी काय म्हटले होते?

अजित पवारांनी आपल्या भाषणात भरणे यांच्यापासून ते टाऊन हॉलच्या अपुऱ्या कामांपर्यंत अनेक मुद्दे उपस्थित केले. त्यांनी म्हटले होते की, काम करण्यासाठी ताकद लागते, फक्त दिखावा करून काम होत नाही. इंदापूरमध्ये अनेक प्रकल्प 17 वर्षांपासून अपूर्ण आहेत. दरम्यान, इंदापूर नगरपरिषद निवडणुकीत आता संघर्ष चुरशीचा होणार हे निश्चित मानले जात आहे. पाटील आणि पवार यांच्यातील वाद पुन्हा एकदा राजकारणाच्या केंद्रस्थानी आला असून, याचा प्रभाव मतदानावर किती पडतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!