Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

‘आम्हाला बहिण-भाऊ म्हणणं बंद करा…’; पंकजा मुंडे यांचं धक्कादायक वक्तव्य, नेमकं काय म्हणाल्या?

‘आम्हाला बहिण-भाऊ म्हणणं बंद करा…’; पंकजा मुंडे यांचं धक्कादायक वक्तव्य, नेमकं काय म्हणाल्या?

बीड: राज्यात नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांचे मतदान सुरू असताना राजकीय हालचालींना वेग आला आहे. आज मतदान प्रक्रियेची सुरुवात झाली असून दुपारी ५.३०पर्यंत मतदारांना मतदानाचा अधिकार बजावता येणार आहे. बीड जिल्ह्यातील रणधुमाळीत पंकजा मुंडे यांनीही जोरदार मेहनत घेतली असून, आता त्यांनी आपल्या तयारीबाबत मोठे विधान केले आहे. पंकजा मुंडे म्हणाल्या की, ‘ही मोहीम फक्त १२ दिवसांची नाही. गेल्या दोन महिन्यांपासून मी नियोजनात गुंतले होते. मुंबईत अनेक बैठका घेतल्या आणि नगरपरिषदेसाठी संपूर्ण यादीही तयार केली. मुंबईतील केवळ एक कॅबिनेट बैठक सोडली तर मी कायम परळीतच मुक्कामी होते. जनता आम्हाला पाठिंबा देईल आणि आमच्या उमेदवारांना मोठा विजय मिळेल,’ असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

हेही वाचा – ‘धनंजय मुंडे इतका नीच माणूस…’; वाल्मिक कराडची आठवण काढल्यानंतर धनंजय मुंडेंवर जरांगेंचा निशाणा

मतदान शांततेत होत आहे, यावर समाधान व्यक्त करत त्या म्हणाल्या, “मतदारांना मुक्तपणे मत देण्याचा अधिकार असावा. कुणी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केल्यास पोलिसांनी व प्रशासनाने योग्य ती कारवाई करायलाच हवी.” दरम्यान, बहिण-भाऊच्या नात्यावरून विचारलेल्या प्रश्नावर पंकजा मुंडे थोड्या कठोर भाषेत म्हणाल्या, ‘आम्हाला बहिण भाऊ म्हणणं बंद करा. आम्ही बहीण भाऊ आहोतचं. पण राजकारणात आम्ही दोघेही मोठे नेते आहोत. ते राष्ट्रवादीकडून, मी भाजपकडून… आणि राज्यभर अनेक ठिकाणी आमची राजकीय आघाडीही आहे. नातं आहे म्हणून आम्ही कमी लढतो असे नाही. दोघांनीही दोन दशकांपासून आपापल्या पक्षासाठी पूर्ण ताकद लावली आहे.’

हेही वाचा – ‘धनूभाऊ तुमचा इंदोरमध्ये मर्डर झाला असता, पण…’; ‘या’ नेत्याने केला खळबळजनक दावा

खूनाच्या कटाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी स्पष्ट सांगितले की, ‘राज्यात कोण काय बोलतं यावर मी प्रतिक्रिया देत नाही. अशा कोणत्याही विचित्र गोष्टीबद्दल माहिती माझ्यापर्यंत येत नाही. आमच्या घरातही वडिलांनी अशा गोष्टींची सर्रास चर्चा होऊ दिली नाही. माझ्या कार्यकर्त्यांनाही माहीत आहे, महिलांबद्दल गैर बोलणं मला अजिबात आवडत नाही. त्यामुळे अशा बाबी माझ्याशी संबंधित नाहीत, त्यावर मी उत्तर का देऊ?’

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!