Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Dattatray Bharne: कर्ज घेणे ही संधी आहे, भगिनींनो त्या संधीचा फायदा घ्या – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

Dattatray Bharne: कर्ज घेणे ही संधी आहे, भगिनींनो त्या संधीचा फायदा घ्या – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

Dattatray Bharne: पूर्वी कोणतीही बँक कर्ज देत नव्हती, कर्ज घेण्यासाठी काहीतरी तारण ठेवावे लागायचे,लोकांना वेळेवर कर्ज मिळत नव्हते, कर्जासाठी अनेक वेळा बँकेत हेलपाटे घालावे लागायचे मात्र महिला स्वयंसहायता समूहाने बँकांचा इतका मोठा विश्वास निर्माण केलेला आहे की बँका आज त्यांना कोणतीही गोष्ट तारण न ठेवता कर्ज देतात… त्यामुळे भगिनींनो कर्ज घेणे ही संधी आहे आणि त्या संधीचा लाभ जास्तीत जास्त घ्या असे गौरवोद्गार कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी काढले.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत महिला स्वयंसहायता समूहांना महाकर्जवाटप मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्यात ७ कोटी ८५ लाख रुपयांचे कर्ज वितरण कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर गटविकास अधिकारी सचिन खुडे, राष्ट्रवादीचे हनुमंत कोकाटे, श्रीमंत ढोले, बँक ऑफ महाराष्ट्र चे महिलाल मीना, उमेद चे तालुका अभियान व्यवस्थापक सचिन बाबर, विविध बँकेचे बँक व्यवस्थापक उपस्थित होते… यावेळी १६७ समूहांना एकूण सात कोटी पंच्याऐंशी लाख रुपयांचे कर्जवाटप कृषी मंत्री भरणे यांच्या हस्ते करण्यात आले.

हेही वाचा Savitribai Phule Jayanti: शिक्षणानेच घडेल समाजपरिवर्तन! इंदापूर महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

कृषिमंत्री भरणे म्हणाले, महिलांची दखल फक्त राज्यात नाही तर संपूर्ण जगाने घेतली आहे, संयुक्त राष्ट्र संघटनेने 2026 हे वर्ष आंतराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर केले आहे…महिला स्वयंसहायता समूहाच्या माध्यमातून तालुक्यामध्ये चांगलं काम चालू आहे, महिला कोणताही समूह एनपीएमध्ये जाऊ देत नाहीत यामध्ये सीआरपी ची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. त्यांच्या पाठपुराव्यामुळे समूह व्यवस्थित चालू आहेत. भगिनींनो तुमच्यासोबत तुमचा मामा तर असेलच पण हा मामा सुद्धा तुमच्या सोबत कायम उभा असेल हा शब्द मी तुम्हाला देतो.. बँकाचे असेल किंवा इतर कोणतीही अडचण असेल तर मी कायम तुमच्या सोबत असेल असं आश्वासन यावेळेस कृषिमंत्री भरणे यांनी दिले.

हेही वाचा – इंदापुरात 10 व 11 जानेवारीला दुसऱ्या ‘मराठी बालसाहित्य संमेलना’चा जागर; विद्यार्थ्यांसाठी मोठी पर्वणी!

कार्यक्रमाची प्रस्तावना गटविकास अधिकारी सचिन खुडे यांनी करताना गत वर्षांमध्ये तालुक्याला 33 कोटी रुपयांचे कर्ज वाटपाचे उद्दिष्ट असताना आत्तापर्यंत तालुक्याने 31 कोटी रुपयांचे उद्दिष्ट पूर्ण केले असून शंभर टक्के उद्दिष्ट पुढील महिन्यापर्यंत पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त केला.
महिलांनी महिला स्वयंसहायता समूहाच्या माध्यमातून वेगवेगळे व्यवसाय उभा केलेले आहेत व त्या व्यवसायातून त्या महिला आता महिला उद्योजिका होत असल्याने येणाऱ्या काळात लखपती दीदी मोठया उद्योजक होतील याचे समाधान व्यक्त केले. यावेळी बँक अधिकारी महेश शेळके, वैभव लाहोत, अमोल वाघमारे, शरद सूळ, रोहिदास राठोड, अशोक थोरात, जयदीप तोरणे, अशोक भिसे, उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राणी ननवरे, आदित्य मांदळे, अमोल गलांडे,सुनिता दातखिळे, ज्ञानेश्वर राऊत,अमर कदम, निर्मला निमगिरे, चेतन रांजणकर, तेजस्विनी शिंदे आदींनी सहकार्य केले. सूत्रसंचालन समाधान भोरकडे यांनी केले.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!