Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

जसप्रीत बुमराहबाबत बीसीसीआय आता घेणार मोठा निर्णय, कसोटी मालिका खेळण्याआधी होणार ‘या’ गोष्टीचा खुलासा!

जसप्रीत बुमराहबाबत बीसीसीआय आता घेणार मोठा निर्णय, कसोटी मालिका खेळण्याआधी होणार ‘या’ गोष्टीचा खुलासा!

मुंबई: इंग्लंड दौऱ्यावरील शेवटच्या कसोटी सामन्यात टीम इंडियाला स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहशिवाय मैदानात उतरावे लागले होते. ओव्हल स्टेडियमवरील पाच सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराह भारतीय प्लेइंग इलेव्हनचा भाग नव्हता आणि त्याचे कारण होते त्याचे वर्कलोड मॅनेजमेंट, जे या संपूर्ण मालिकेत चर्चेचा विषय ठरले होते. पण आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) या प्रकरणी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. एका रिपोर्टनुसार, जसप्रीत बुमराह संपूर्ण मालिकेसाठी उपलब्ध असेल तरच त्याची निवड होऊ शकते.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय बोर्ड जसप्रीत बुमराहबाबतच्या सध्याच्या धोरणाचा आढावा घेणार आहे. इंग्लंड दौऱ्यात बुमराहच्या फिटनेस आणि वर्कलोड मॅनेजमेंटवरून झालेल्या गदारोळामुळे हा आढावा घेण्यात येत आहे. खरं तर या मालिकेपूर्वीच बुमराह 5 पैकी फक्त 3 टेस्ट खेळणार असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. पण त्या तीन टेस्ट कोणत्या असतील, हे स्पष्ट करण्यात आले नव्हते.

त्याचा परिणाम गेल्या दोन कसोटीत दिसून आला, जिथे बुमराह मँचेस्टरमध्ये खेळला. पण त्याला ओव्हलमध्ये विश्रांती घ्यावी लागली, तर ओव्हलची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी अधिक उपयुक्त ठरली. पण बुमराहची अशी परिस्थिती आता बीसीसीआयलाही सतावत आहे. बीसीसीआयच्या सूत्रांच्या हवाल्याने या वृत्तात म्हटले आहे की, बुमराह कोणता सामना खेळेल आणि कोणता खेळणार नाही याबाबत परिस्थिती स्पष्ट नसल्याने कोणत्याही कसोटी मालिकेसाठी संघ निवडीचे नियोजन करणे कठीण आहे.

इतकंच नाही, तर बीसीसीआय या प्रकरणी मोठा निर्णय घेणार असल्याचं समजतंय. या अहवालात म्हटले आहे की, बीसीसीआय आता बुमराहला त्याच मालिकेत निवडण्याचा विचार करू शकते, जिथे तो सर्व सामन्यांसाठी उपलब्ध असेल. त्यासाठी वैद्यकीय पथक आणि स्ट्रेंथ कंडिशनिंग (एस अँड सी) कोचिंग टीमवर जबाबदारी राहणार आहे. प्रत्येक मालिकेसाठी संघ निवडण्यापूर्वी वैद्यकीय संघाला बुमराहच्या फिटनेसचा खुलासा करावा लागेल. त्याचबरोबर एस अँड सी टीम फिटनेसच्या आधारे आपल्या वर्कलोडवर मर्यादा ठरवू शकते.

पुढच्या कसोटी मालिकेत विश्रांती मिळेल का?
आता बीसीसीआयच्या या धोरणाची योग्य अंमलबजावणी कधी होईल, हे येत्या काळातच कळेल. ओव्हल कसोटी सुरू होताच बीसीसीआयने बुमराहला टीम इंडियाच्या संघातून वगळण्याची घोषणा केली. सध्या टीम इंडिया ऑक्टोबर-नोव्हेंबरपूर्वी कोणतीही कसोटी मालिका खेळत नाही. या फॉरमॅटमध्ये भारताचा पुढचा सामना घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध असेल, ज्यात 2 कसोटी सामने खेळले जातील. यात बुमराहला पूर्ण विश्रांती दिली जाण्याची दाट शक्यता आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!