Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

BCCI Out of RTI Act: क्रिकेटप्रेमींसाठी मोठी बातमी! BCCI आता माहिती अधिकाराच्या कचाट्यातून मुक्त

BCCI Out of RTI Act: क्रिकेटप्रेमींसाठी मोठी बातमी! BCCI आता माहिती अधिकाराच्या कचाट्यातून मुक्त

BCCI Out of RTI Act: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) पारदर्शकतेबाबत गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर आता पूर्णविराम मिळाला आहे. केंद्रीय माहिती आयोगाने (CIC) एका महत्त्वपूर्ण निर्णयात स्पष्ट केले आहे की, BCCI ही संस्था ‘माहितीचा अधिकार’ (RTI) कायद्याच्या कक्षेत येणार नाही. माहिती आयुक्त पी.आर. रमेश यांनी हा निकाल देताना मंडळाला ‘सार्वजनिक प्राधिकरण’ (Public Authority) मानण्यास नकार दिला आहे.

२०१८ चा निर्णय आयोगाकडूनच रद्द
यापूर्वी २०१८ मध्ये केंद्रीय माहिती आयोगानेच बीसीसीआयला आरटीआयच्या कक्षेत आणण्याचा निर्णय दिला होता. “खेळाडूंच्या जर्सीवर देशाचे नाव असते आणि हे मंडळ भारताचे प्रतिनिधित्व करते, त्यामुळे ते जनतेला उत्तरदायी हवे,” असा तर्क तेव्हा देण्यात आला होता. मात्र, ताज्या सुनावणीत आयोगाने आपला हा जुना निर्णय बदलला असून, आरटीआय कायद्याच्या कलम 2(h) नुसार बीसीसीआय ही सरकारी संस्था ठरत नसल्याचे स्पष्ट केले आहे.

उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकषांचा आधार
या प्रकरणाचा प्रवास न्यायालयातही रंगला होता. मद्रास उच्च न्यायालयाने हे प्रकरण पुन्हा माहिती आयोगाकडे सोपवताना ‘नव्याने’ सुनावणी करण्याचे आदेश दिले होते. बीसीसीआयने स्वतःला एक स्वायत्त आणि खासगी संस्था असल्याचे न्यायालयात ठामपणे सांगितले होते. सर्वोच्च न्यायालयाने लोढा समितीच्या माध्यमातून सुधारणा सुचवल्या असल्या, तरी मंडळाला कधीही ‘सरकारी यंत्रणा’ म्हणून घोषित केलेले नाही, हा तांत्रिक मुद्दा या निकालात महत्त्वाचा ठरला आहे.

नेमका परिणाम काय होणार?
या ऐतिहासिक निकालानंतर आता बीसीसीआयवर माहिती अधिकार कायद्यांतर्गत कोणतीही माहिती सार्वजनिक करण्याचे कायदेशीर बंधन राहणार नाही. क्रीडा मंत्रालयानेही यापूर्वीच स्पष्ट केले होते की, मंडळावर सरकारचे थेट नियंत्रण नसल्याने त्यांच्याकडे आरटीआय अर्ज वर्ग करता येत नाहीत. या निर्णयामुळे बीसीसीआयची ‘स्वायत्त संस्था’ ही ओळख अधिक अधोरेखित झाली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!