Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

आजपासून अंतिम कसोटी; भारताला बरोबरी साधण्याची संधी

आजपासून अंतिम कसोटी; भारताला बरोबरी साधण्याची संधी

केनिंगटन: भारत विरुद्ध इंग्लंड क्रिकेट संघांमध्ये सध्या ५ कसोटी क्रिकेट सामन्यांची मालिका सुरू असून, या मालिकेत भारतीय क्रिकेट संघ २-१ ने पिछाडीवर आहे. आजपासून अखेरचा सामना खेळविण्यात येणार आहे. मालिकेत बरोबरी साधण्यासाठी भारतीय क्रिकेट संघ सज्ज झाला आहे. अखेरच्या सामन्यात विजय संपादन करून मालिका खिशात टाकण्यासाठी इंग्लंड क्रिकेट संघाचा प्रयत्न असणार आहे.

पाचव्या कसोटी क्रिकेट सामन्यातून जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराहने माघार घेतली आहे. तसेच यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतला ऑल ट्रॅफर्ड क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या सामन्यात दुखापत झाली होती. त्यामुळे भारतीय संघ व्यवस्थापनाने नारायण जगदीशनला पर्यायी यष्टीरक्षक फलंदाज म्हणून स्थान दिले आहे. तसेच ध्रुव जुरेलही संघात सामील असल्याने भारतीय संघ व्यवस्थापनासमोर संघ निवड करण्याचे मोठे आव्हान असणार आहे. तसेच आकाशदिपही दुखापतीतून सावरून संघात सामील झाला आहे. तो पूर्णपणे तंदुरुस्त झाल्याचे गौतम गंभीर यांनी सांगितले आहे.

अर्शदिपसिंगही संघात असल्यामुळे त्यालाही पदार्पण करण्याची संधी मिळू शकते. त्याने ९ एकदिवसीय आणि ६३ टी २० सामने खेळले असून, एकदिवसीय सामन्यात १४ तसेच टी २० मध्ये ९९ गडी बाद केले आहेत. भारतीय क्रिकेट संघाच्या इंग्लंड विरुद्ध कसोटी क्रिकेट मालिकेसाठी जाहीर झालेल्या संघाचा भाग असलेल्या अर्शदिपसिंगला पहिल्या ३ सामन्यात संधी मिळाली नव्हती. मात्र चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या सरावादरम्यान त्याच्या हाताला दुखापत झाल्याने या कसोटी क्रिकेट सामन्याला मुकावे लागले होते. भारतीय क्रिकेट संघाकडे अंशुल कंबोज आणि शार्दूल ठाकूर हे पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे भारतीय संघ व्यवस्थापन पाचव्या सामन्यात कोणते बदल करणार? हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड क्रिकेट संघांमध्ये ५ कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना केनिंगटन ओव्हल लंडन येथे खेळविण्यात येणार आहे. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंड क्रिकेट संघाने २-१ ने विजयी आघाडी घेतली आहे. अखेरच्या सामन्यात विजय संपादन करून मालिका खिशात टाकण्यासाठी इंग्लंड क्रिकेट संघाचा प्रयत्न असणार आहे.

इंग्लंड क्रिकेट संघाने आपला अंतिम ११ खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. इंग्लंड क्रिकेट संघाचा नियमित कर्णधार बेन स्ट्रोक्सने उजव्या खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे माघार घेतली आहे. त्यामुळे संघाचे कर्णधारपद ओली पोपकडे सोपविण्यात आले आहे. इंग्लंड क्रिकेट संघाने जाहीर केलेल्या संघात ३ बदल केले असून, यामध्ये जोफ्रा आर्चर, लियम डॉसन आणि ब्रायडन कार्स यांना विश्रांती देण्यात आली आहे. बदली खेळाडू म्हणून जेकब बेथेल, गस अॅटकिंसन आणि जॉश टंग यांना स्थान देण्यात आले आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!