Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

टीम इंडियाला मिळाला नवीन प्रायोजक! आता जर्सीवर ‘या’ कंपनीने नाव झळकणार

टीम इंडियाला मिळाला नवीन प्रायोजक! आता जर्सीवर ‘या’ कंपनीने नाव झळकणार

Team India Jersey Sponsor: आशिया कप 2025 दरम्यान टीम इंडियाच्या जर्सीवर आता अपोलो टायर्सचे नाव दिसणार आहे. ड्रीम 11 शी झालेल्या कराराच्या समाप्तीनंतर, बीसीसीआयने तीन वर्षांसाठी अपोलो टायर्सला जर्सी प्रायोजक म्हणून नियुक्त केले आहे. करारानुसार, कंपनी बीसीसीआयला 2027 पर्यंत 579 कोटी रुपये देणार आहे.

अपोलो टायर्स प्रत्येक सामन्यासाठी बीसीसीआयला 4.5 कोटी रुपये देईल, जे पूर्वी ड्रीम 11 देत असलेल्या रकमेपेक्षा जास्त आहे. भारतीय संघ आशिया कप 2025 मध्ये सध्या कोणत्याही प्रायोजकाशिवाय खेळत आहे. त्याचप्रमाणे, भारतीय महिला संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन एकदिवसीय मालिकेत सध्या जर्सी प्रायोजकशिवाय आहे.

आगामी महिला विश्वचषकात महिला संघाच्या जर्सीवर नवीन प्रायोजक दिसेल की नाही, हे अद्याप निश्चित झालेले नाही. बीसीसीआयने 2 सप्टेंबर 2025 रोजी जर्सी प्रायोजकांसाठी नवीन बोली नियम जाहीर केले होते. या नियमांनुसार गेमिंग, बेटिंग, क्रिप्टो आणि तंबाखू कंपन्यांना बोली लावण्याची परवानगी नव्हती. पूर्वी ड्रीम 11 बीसीसीआयचा प्रमुख प्रायोजक होता.

दरम्यान, जुलै 2023 मध्ये झालेल्या कराराअंतर्गत ड्रीम 11ला पुरुष, महिला, अंडर-19 आणि भारत-अ संघाच्या किटसाठी प्रायोजकत्व मिळाले होते. भारत सरकारच्या नवीन कायद्यामुळे हा करार संपल्यावर ड्रीम 11ला कोणताही दंड भरण्याची गरज नाही. आज ड्रीम 11चे ब्रँड मूल्य सुमारे 8 डॉलर अब्ज आहे. तथापी, कंपनीने आयपीएलमध्ये देखील मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!