Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Local Body Election Date: सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश; ‘या’ महिन्यात पार पडणार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका

Local Body Election Date: सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश; ‘या’ महिन्यात पार पडणार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका

Local Body Election Date: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये दीर्घकालीन विलंबावर अखेर न्यायालयाने निर्णय घेतला आहे. राज्यातील जिल्हा परिषदा, महानगरपालिका आणि पंचायत समितीच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत होणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने आज स्पष्ट केले. सुनावणीदरम्यान न्यायालयाने निवडणूक आयोगाला अखेरची तारीख निश्चित करण्याचे आदेश दिले.

हेही वाचा – Pune Lift Collapses: पुण्यात वाघोलीतील अर्बनो सोसायटीत लिफ्ट कोसळली; 6 जण जखमी, रहिवाशांकडून बिल्डरविरोधात तक्रार

याआधी, मे महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांच्या कालावधीत निवडणुका घेण्याचे निर्देश दिले होते, मात्र पावसामुळे आणि इतर अडचणींमुळे त्या विलंबित झाला होता. तथापी, ओबीसी आरक्षणाच्या अंमलबजावणीशी संबंधित निकालामुळे देखील 2022 पासून निवडणुका लांबलेल्या होत्या.

हेही वाचा – पुण्यात आयकर विभागाची मोठी कारवाई! कोहिनूर आणि मित्तल ग्रुपवरच्या कार्यालयावर टाकले छापे

न्यायालयाने आज निवडणूक आयोगाला स्पष्ट सूचना दिल्या आहेत. प्रभाग रचना 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत पूर्ण करणे आवश्यक असल्याचेही न्यायायलाने सांगितले असून नोव्हेंबरमध्ये EVMची पूर्तता करणेही अनिवार्य असल्याचे निदर्शनास आणले. तथापी, निवडणूक आयोगाने बोर्ड परीक्षा आणि कर्मचाऱ्यांच्या अभावाचे मुद्दे मांडले, परंतु न्यायालयाने फक्त बोर्ड परीक्षेच्या कारणास मान्यता दिली नाही. या आदेशानंतर, पुढील चार महिन्यांत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आयोजित केल्या जातील, असे संकेत मिळाले आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!