Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

‘पीएमपी’च्या थकबाकीचा कर्मचाऱ्यांना फटका; रुग्णालयांमध्ये उपचारापासून वंचित, 20 कोटींहून अधिकचा आकडा

‘पीएमपी’च्या थकबाकीचा कर्मचाऱ्यांना फटका; रुग्णालयांमध्ये उपचारापासून वंचित, 20 कोटींहून अधिकचा आकडा

पुणे: पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या कर्मचारी, अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांवर उपचारासाठी शहरातील काही रुग्णालयांबरोबर करार करण्यात आला आहे. परंतु, रुग्णालयांचे 20 कोटींहून अधिक वैद्यकीय बिले गेले काही महिन्यांपासून थकविल्याने कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय उपचार करणे बंद केले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना गैरसोयीचा फटका बसत आहे.

पीएमपीकडून कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या उपचारासाठी ‘अंशदायी वैद्यकीय सहाय योजना’ राबविली जाते. यात जवळपास आठ हजार 300 कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांना आणि त्यांच्या कुटुंबातील आई-वडील, पत्नी, दोन मुलांना या योजनेचा लाभ मिळतो. त्यासाठी कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या वेतनातून 2 टक्के रक्कम कपात केली जाते. कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात केले जाणाऱ्या साधारण 75 लाख रुपये दर महिन्याला वैद्यकीय योजनेसाठी गोळा केले जातात.

या योजनेत उपचाराचा खर्च पीएमपी 90 टक्के आणि दहा टक्के स्वतः भरावा लागतो. या योजनेत शहरातील सर्व नामांकित अशा 72 पेक्षा जास्त रुग्णालयामध्ये उपचार घेता येतात. शिवाय तीन हजार निवृत्त कर्मचाऱ्यांनाही या योजनेतून उपचार मिळते. यामुळे त्यांना दिलासा मिळतो. परंतु, गेल्या दीड वर्षापासून पीएमपीकडून महत्त्वाच्या हॉस्पिटलची बिले थकली आहेत. त्यामुळे हॉस्पिटलकडून उपचार बंद केले आहे.

हे आहेत हॉस्पिटल

पूना हॉस्पिटल एक कोटी, दीनानाथ मंगेशकर साठ लाख, केईएम दोन कोटी, नोबेल दीड कोटी, जहांगीर एक कोटी, बुधराणी, सह्याद्री अशा महत्त्वाच्या आणि मोठ्या हाॅस्पिटलची बिले थकली आहेत. याशिवाय काही महत्त्वाच्या हॉस्पिटलकडून पैसे मिळत नसल्यामुळे उपचार बंद केले होते. आता इतरही हॉस्पिटलमध्ये कर्मचाऱ्यांना उपचार मिळणे बंद झाले आहे. त्याचा फटका कर्मचाऱ्यांना बसत आहे. त्यामुळे या हॉस्पिटलमध्ये उपचार मिळावेत म्हणून प्रयत्न करावेत, अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे.

वेळेत बिल भरा :

पीएमपीकडून करार केलेल्या हाॅस्पिटलच्या बिलांचे पैसे टप्प्याटप्प्याने दिले जातात. नुकतेच पीएमपीकडून नोबेल हाॅस्पिटलचे एक कोटी बिल भरले आहे. इतर हॉस्पिटलची बिले बाकी आहे. जसे निधी येईल तशी बिले दिली जातात. तरीही हॉस्पिटलकडून उपचार बंद केले आहेत. इतर सरकारी विभागाची बिले थकले तरी त्यांना उपचार दिले जातात. पण, पीएमपीचे बिल थकले तर उपचार बंद करणे योग्य नसल्याची भावना अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. परंतु, हाॅस्पिटलची बिले वेळेत भरली पाहिजे, असे कर्मचारी संघटनेने मागणी केली आहे.

अशी आहे आकडेवारी :

– एकूण कर्मचारी – ८३००

– करारबद्ध हाॅस्पिटल – ७२

– थकीत रक्कम : २० कोटी

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!