Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Weather Alert: कोकणात पावसाचा इशारा! राज्यातील अनेक भागांत थंडी कमी होण्याची शक्यता

Weather Alert: कोकणात पावसाचा इशारा! राज्यातील अनेक भागांत थंडी कमी होण्याची शक्यता

Weather Alert: भारतीय हवामान विभागाच्या (IMD) कुलाबा वेधशाळेने महाराष्ट्रासाठी नवीन हवामान अंदाज जारी केला असून २२, २३ आणि २४ नोव्हेंबर रोजी दक्षिण कोकण आणि दक्षिण-मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. राज्यातील उर्वरित भागात कोरडे हवामान कायम राहील, अशी शक्यता आहे.

मुंबई: निरभ्र आकाश

मुंबई आणि उपनगरांमध्ये पुढील काही दिवस प्रामुख्याने निरभ्र आकाश राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यानुसार, कमाल तापमान ३३°C तर किमान तापमान २१°C राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये हलक्या सरींची शक्यता आहे.

कोकण-पश्चिम महाराष्ट्र: हलक्या पावसाची चिन्हे

IMD नुसार खालील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. तथापी, पुणे आणि सोलापूर येथे हवामान कोरडेच राहील.

हेही वाचा – Pune: पुणेकरांनो लक्ष द्या! उघड्यावर शेकोटी पेटवल्यास बसणार दंड, थंडीच्या दिवसात महापालिकेचा अजब निर्णय

उत्तर महाराष्ट्र: थंडीची तीव्रता कमी

गेल्या काही दिवसांत वाढलेल्या थंडीपासून उत्तरेकडील जिल्ह्यांना थोडा दिलासा मिळू शकतो.
नाशिक: कमाल ३०°C, किमान १३°C
जळगाव: कमाल ३०°C, किमान १३°C

मराठवाडा: तापमानात सौम्य वाढ

मराठवाड्यात हळूहळू रात्रीचे तापमान वाढताना दिसू शकते. तथापी, छत्रपती संभाजीनगरमध्ये किमान तापमान १५°C पर्यंत वाढणार आहे. याशिवाय, विदर्भांत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात पुढील दोन दिवसांमध्ये थंडीपासून आंशिक दिलासा मिळू शकतो. दक्षिण कोकण आणि दक्षिण-मध्य भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता असून, राज्यात मोठ्या हवामान बदलाचा कोणताही अंदाज नाही. नागरिकांनी हवामानातील बदल लक्षात ठेवून आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन IMD ने केले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!