मुंबई : गायक दिलजीत दोसांझ लवकरच इंडस्ट्रीमध्ये एक मोठे नाव बनले आहे. अभिनय असो वा संगीत, त्याचं सर्वत्र एक नाव कोरलं जात आहे. यशासोबतच त्याला काही संघर्षही करावा लागताना दिसत आहे. आता, दिलजीतने नेटफ्लिक्सवर एक व्हिडिओ रिलीज केला आहे, ज्यामध्ये तो चित्रपटांबद्दल आणि कलाकारांच्या संघर्षांबद्दल बोलताना दिसत आहे.
दिलजीत दोसांझने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये तो ‘चमकीला’ चित्रपटाच्या चित्रीकरणाबद्दल बोलतो. त्यानंतर त्याने म्हटले की, एका कलाकाराला आयुष्यात अनेक वेगवेगळ्या परिस्थितींचा सामना करावा लागतो. जोपर्यंत तो मरत नाही किंवा ‘चमकीला’सारखे मारले जात नाही, तोपर्यंत लोक त्यांना महान म्हणत नाहीत किंवा त्यांना प्रेम देत नाहीत.
तसेच लोक कलाकारांना जिवंत असताना ते ज्याला पात्र आहेत ते प्रेम देत नाहीत. ते प्रेम त्यांना फक्त ते जग सोडून गेल्यावरच मिळते. जिवंत कलाकाराची कोणीही कदर करत नाही. एखाद्या कलाकाराच्या कामाचे कौतुक त्यांच्या मृत्यूनंतरच होते, कारण ते आता जिवंत नसतात. किंवा ते तुमचे स्पर्धकही नाहीत. तिसरे म्हणजे, मृतांचा आदर करणे हा मानवी स्वभाव आहे.
जग हे चित्रपटाच्या सेटसारखे
दलजीत पुढे म्हणाला की, हे जग एका चित्रपटासारखे आहे. जोपर्यंत कलाकार जिवंत असतो तोपर्यंत त्यांना शक्य तितका त्रास दिला जातो. त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळतात. समाज त्यांचे काम सहन करू शकत नाही, असे म्हटले.


