Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

BMC Election 2026: मुंबईचा ‘किंग’ कोण? बीएमसी निवडणुकीचा पहिला सर्व्हे समोर; ठाकरे बंधूंच्या युतीमुळे महायुतीचं टेन्शन वाढणार?

BMC Election 2026: मुंबईचा ‘किंग’ कोण? बीएमसी निवडणुकीचा पहिला सर्व्हे समोर; ठाकरे बंधूंच्या युतीमुळे महायुतीचं टेन्शन वाढणार?

BMC Election 2026: मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) रणसंग्रामाचे बिगुल वाजण्यापूर्वीच राजकीय वातावरण तापू लागले आहे. ‘ठाकरे विरुद्ध महायुती’ अशा चुरशीच्या लढतीत मुंबईची सत्ता कोणाकडे जाणार, याबाबतचा पहिला कल आता समोर आला आहे. ‘व्होट वाईब इंडिया’ने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मुंबईत भाजप-शिंदे जोडी आणि ठाकरे बंधू यांच्यात काँटे की टक्कर होण्याची शक्यता आहे.

जादुई आकडा कोण गाठणार?

मुंबई महापालिकेच्या २२७ जागांसाठी लागणारा ११४ हा बहुमताचा आकडा गाठताना महायुतीला कसरत करावी लागणार असल्याचे दिसते. अमिताभ तिवारी (संस्थापक, व्होट वाईब इंडिया) यांच्या विश्लेषणानुसार मुंबई महानगरपालिकेच्या २२७ जागांच्या निकालाचे चित्र अत्यंत चुरशीचे दिसत आहे. या अंदाजानुसार, भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना मिळून ११४ जागांचा बहुमताचा आकडा गाठताना दिसत असून, यामध्ये भाजपला ८२ तर शिंदे गटाला ३२ जागा मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, शिवसेना (UBT) आणि मनसे यांच्या युतीला ७९ जागा मिळतील असा अंदाज आहे. काँग्रेस स्वबळावर लढल्यास त्यांना १९ जागांवर समाधान मानावे लागेल, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ५ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उर्वरित १० जागा इतर लहान पक्ष आणि अपक्ष उमेदवारांच्या खात्यात जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – Thackeray Alliance: ‘मराठी अस्मितेसाठी इंजिन आणि मशाल एकवटली’; 7 महापालिकांसाठी ठाकरे बंधूंची ऐतिहासिक युती जाहीर

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत युतीची घोषणा केल्याने यंदाची निवडणूक अधिक रंजक झाली आहे. मुंबईतील ४० टक्के मराठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी ठाकरे बंधूंची भावनिक लाट निर्णायक ठरू शकते. गेल्या निवडणुकीत मुस्लिम मतदारांनी मविआला साथ दिली होती. मात्र, आता काँग्रेस स्वतंत्र लढत असल्याने ही मते विभागली जाण्याची भीती आहे. ही मते जर मोठ्या प्रमाणावर ठाकरे युतीकडे वळाली, तर निकालाचे चित्र पूर्णपणे पालटू शकते.

महायुतीसमोर ‘मराठी’ मतांचे आव्हान

गेल्या आठ वर्षांत भाजपने मुंबईत आपली ताकद मोठ्या प्रमाणावर वाढवली आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांची शिवसेना किती मराठी मते आपल्याकडे वळवण्यात यशस्वी ठरते, यावरच महायुतीचे भवितव्य अवलंबून असेल. जर शिंदे गटाने मराठी मतांमध्ये मोठी फूट पाडली, तर भाजपला ‘मुंबई काबीज’ करणे सोपे जाईल; अन्यथा ठाकरे बंधूंचा ‘मराठी बाणा’ महायुतीची सत्तास्थापनेची स्वप्ने धुळीस मिळवू शकतो.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!