Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Thackeray Alliance: ‘मराठी अस्मितेसाठी इंजिन आणि मशाल एकवटली’; 7 महापालिकांसाठी ठाकरे बंधूंची ऐतिहासिक युती जाहीर

Thackeray Alliance: ‘मराठी अस्मितेसाठी इंजिन आणि मशाल एकवटली’; 7 महापालिकांसाठी ठाकरे बंधूंची ऐतिहासिक युती जाहीर

Raj Thackeray Uddhav Thackeray Alliance: महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी आणि बहुप्रतीक्षित घडामोडीवर अखेर बुधवारी शिक्कामोर्तब झाले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही बंधूंनी वैयक्तिक मतभेद बाजूला सारून ‘शिवसेना (उबाठा) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ यांच्या युतीची अधिकृत घोषणा केली. वरळी येथील ‘ब्लू सी’ हॉटेलमध्ये झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत दोन्ही नेत्यांनी आम्ही राज्याच्या हितासाठी एकत्र आलो आहोत, असा ठाम संदेश दिला.

शिवतीर्थावर संपूर्ण ठाकरे कुटुंब एकत्र

युतीच्या घोषणेपूर्वी एक भावनिक दृश्य पाहायला मिळाले. राज आणि उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब दादरच्या शिवतीर्थावर जाऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले. यावेळी रश्मी ठाकरे, शर्मिला ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या उपस्थितीने ‘एकवटलेल्या ठाकरे कुटुंबाची’ ताकद अधोरेखित झाली.

हेही वाचा – ‘अजित पवारांना महायुतीत राहण्याचा अधिकार…’; पुण्यातील राष्ट्रवादीच्या युतीवर संजय राऊतांचा घणाघात

राज ठाकरेंचा रोखठोक पवित्रा

पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे म्हणाले, “कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, या विचारातूनच आमच्या एकत्र येण्याची सुरुवात झाली. सध्या राजकारणात ‘पार्टी फोडणाऱ्या आणि उमेदवार पळवणाऱ्या’ टोळ्या सक्रिय आहेत, त्यामुळे आम्ही जागावाटपाचा आकडा आताच जाहीर करणार नाही. राज यांनी पुढे ठणकावून सांगितले की, ‘मुंबईचा आगामी महापौर हा मराठीच असेल आणि तो आमच्या युतीचाच असेल. ज्यांना मुंबई आणि महाराष्ट्रावर प्रेम आहे, त्यांनी या युतीला साथ द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

‘आता चुकाल तर संपाल’ – उद्धव ठाकरे

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात भाजपवर कडक शब्दांत टीका केली. भाजपला मुंबईचे लचके तोडायचे आहेत. आता आम्ही आपसात भांडत राहिलो, तर तो हुतात्म्यांचा अपमान ठरेल. आम्ही केवळ एकत्र आलो नाही, तर आता कायम एकत्र राहण्यासाठी आलो आहोत, असे ते म्हणाले. विधानसभेतील ‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेचा समाचार घेताना उद्धव ठाकरे यांनी मराठी माणसाला सावध केले की, आता चुकाल तर कायमचे संपाल, त्यामुळे मराठीचा वसा सोडू नका.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!