Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Massajog Election: मस्साजोगचा फैसला आता मतदारांच्या हाती; 3 उमेदवारांची माघार, पण ‘या’ उमेदवारांने अर्ज मागे घेण्यास दिला नकार

Massajog Election: मस्साजोगचा फैसला आता मतदारांच्या हाती; 3 उमेदवारांची माघार, पण ‘या’ उमेदवारांने अर्ज मागे घेण्यास दिला नकार

Massajog Election: सरपंच संतोष देशमुख यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या मस्साजोगच्या सरपंचपदासाठी आता रसाकशी होणार आहे. राजकीय वर्तुळात ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जात होती, मात्र अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी चित्र पालटले. स्वरूपानंद देशमुख यांनी माघार न घेता मैदानात कायम राहण्याचा निर्णय घेतल्याने आता येथील फैसला थेट मतपेटीतून होणार आहे.

मैदानात आता केवळ दोनच ‘देशमुख’
सुरुवातीला या महत्त्वाच्या पदासाठी एकूण पाच इच्छुकांनी दावेदारी सादर केली होती. मात्र, शुक्रवारी दुपारी अर्ज माघारीच्या मुदतीपर्यंत संजिवनी देशमुख, पंजाब देशमुख आणि करूणा देशमुख यांनी आपली नावे मागे घेतली. परिणामी, आता रिंगणात दिवंगत सरपंचांच्या पत्नी अश्विनी देशमुख आणि त्यांचे जुने राजकीय प्रतिस्पर्धी स्वरूपानंद देशमुख यांच्यातच ‘कांटे की टक्कर’ पाहायला मिळेल.

भावनाविवश वातावरण आणि जुने राजकीय हिशोब
ही पोटनिवडणूक जरी केवळ 18 महिन्यांच्या अल्प काळासाठी असली, तरी गावाने ती प्रतिष्ठेची केली आहे.

  • अश्विनी देशमुख (वारसा आणि सहानुभूती): पतीच्या निधनामुळे गावात त्यांच्याबद्दल प्रचंड सहानुभूती आहे. संतोष देशमुखांचे अपूर्ण राहिलेले गावच्या विकासाचे आणि पाणीप्रश्नाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या मतदारांसमोर जात आहेत.
  • स्वरूपानंद देशमुख (जुना अनुभव आणि जनसंपर्क): स्वरूपानंद हे गावातील अनुभवी राजकारणी आहेत. मागील निवडणुकीत त्यांनी संतोष देशमुखांना जोरदार टक्कर दिली होती आणि त्यांचा पराभव केवळ 9 मतांच्या निसटत्या फरकाने झाला होता. त्यामुळे यावेळी ते ही कसर भरून काढण्यासाठी सज्ज झाले आहेत.

29 एप्रिलला मतदारांचा कौल स्पष्ट होणार
मस्साजोग गावातील एकूण 2,284 मतदारांच्या निर्णयावर या दोन्ही उमेदवारांचे राजकीय भविष्य अवलंबून आहे. गावची सहानुभूती अश्विनी देशमुखांच्या पाठीशी उभी राहते की स्वरूपानंद यांचा जुना जनसंपर्क यशस्वी ठरतो, हे 29 एप्रिल रोजी होणाऱ्या मतमोजणीनंतर स्पष्ट होईल.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!