Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

युवराज सिंग आणि रॉबिन उथप्पाच्या अडचणीत वाढ, ईडीने नोटीस पाठवत चौकशीसाठी बोलावले

युवराज सिंग आणि रॉबिन उथप्पाच्या अडचणीत वाढ, ईडीने नोटीस पाठवत चौकशीसाठी बोलावले

नवी दिल्ली: ऑनलाईन बेटिंग अ‍ॅप प्रकरणात माजी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंग आणि रॉबिन उथप्पा यांनाही समन्स बजावण्यात आले आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दोघांनाही नोटीस पाठवून चौकशीसाठी बोलावले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीने उथप्पाला २२ सप्टेंबर रोजी चौकशीसाठी बोलावले आहे, तर युवराज सिंगला २३ सप्टेंबर रोजी समन्स बजावण्यात आले आहे. दोन्ही क्रिकेटपटूंची दिल्लीतील ईडी मुख्यालयात चौकशी केली जाईल.

ईडी उथप्पा आणि युवराजची चौकशी करणार
ऑनलाईन बेटिंग अ‍ॅप प्रकरणात या दोन माजी भारतीय क्रिकेटपटूंची चौकशी केली जाईल. युवराज आणि उथप्पा हे एकमेव क्रिकेटपटू नाहीत, ज्यांना या मुद्द्यावर ईडीकडून समन्स बजावण्यात आले आहे. यापूर्वी सुरेश रैना आणि शिखर धवन यांनाही या संदर्भात समन्स बजावण्यात आले आहे. भारतीय क्रिकेटपटूंची चौकशी करण्याचे हे संपूर्ण प्रकरण बेटिंग अ‍ॅप 1xBet शी संबंधित आहे.

अंमलबजावणी संचालनालय गेल्या काही काळापासून ऑनलाईन बेटिंग प्लॅटफॉर्म्सविरुद्धच्या तपासाला गती देत ​​आहे. या प्रकरणात, ईडीची चौकशी मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत म्हणजेच पीएमएलए अंतर्गत सुरू आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!