Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पिंपरी-चिंचवड खून प्रकरणात नवा ट्विस्ट! पत्नी आणि तिच्या प्रियकरावर नकुल भोईर यांच्या हत्येचा आरोप

पिंपरी-चिंचवड खून प्रकरणात नवा ट्विस्ट! पत्नी आणि तिच्या प्रियकरावर नकुल भोईर यांच्या हत्येचा आरोप

Pimpri Chinchwad Murder: पिंपरी-चिंचवडमध्ये घडलेल्या नकुल भोईर खून प्रकरणाने नाट्यमय वळण घेतलं आहे. सुरुवातीला घरगुती वाद म्हणून समोर आलेल्या या घटनेचा आता प्रेम आणि सूड या दुहेरी कारणांशी संबंध असल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. चिंचवड पोलिसांनी नकुल भोईरची पत्नी चैताली भोईरचा कथित प्रियकर सिद्धार्थ पवार याला अटक केली आहे. तपासात समोर आलं आहे की चैताली आणि सिद्धार्थ यांच्यात गुप्त प्रेमसंबंध होते, आणि नकुल या नात्याला कडाडून विरोध करत होता. त्यामुळे पती-पत्नीमध्ये सातत्याने वाद सुरू होते.

वादातून खुनाकडे प्रवास

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, नकुलला चैतालीने कर्ज घेतल्याचं समजल्यावर त्यांच्या नात्यातील तणाव आणखी वाढला. अशाच एका वादात, सिद्धार्थच्या उपस्थितीत नकुलने चैतालीवर हल्ला केला. यामुळे संतप्त झालेल्या चैताली आणि सिद्धार्थने नकुलचा खून करण्याचा कट रचला. त्यानंतर त्यांनी एकत्र येऊन दुपट्ट्याने गळा आवळून नकुलचा खून केला, अशी प्राथमिक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.

हेही वाचा – Phaltan Crime: फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणात नवा खुलासा! शवविच्छेदन अहवाल पोलिसांच्या हाती

पोलिसांचा तपास सुरु

चिंचवड पोलिसांनी सिद्धार्थ पवारला अटक करून खुनामागचा हेतू, नियोजन आणि संपूर्ण घटनाक्रम शोधण्याचा तपास सुरू केला आहे. या प्रकरणातील आणखी काही धक्कादायक बाबी पुढील तपासात उघड होण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे पिंपरी-चिंचवड परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सुरुवातीला हे प्रकरण केवळ घरगुती वादाचे वाटत असले तरी, आता ते प्रेम आणि पैशाच्या वादातून जन्मलेल्या खुनात परिवर्तित झालं आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!