Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

सुबोधला करायचाय ड्रीम रोल ?

सुबोधला करायचाय ड्रीम रोल ?

महाराष्ट्र जागरण डेस्क: मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणजे सुबोध भावे. सुबोधला आपण विविध सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय. ‘बालगंधर्व’, ‘लोकमान्य’, ‘कट्यार काळजात घुसली’, ‘आणि.. डॉ. काशीनाथ घाणेकर’ अशा विविध सिनेमांमधून सुबोधने प्रेक्षकांचं मन जिंकलंय. सुबोध भावेचा ‘संगीत मानापमान’ नुकताच प्रर्दशित झाला आहे. सुबोध भावेने एका मुलाखतीत त्याच्या ड्रीम रोलबद्दल सर्वांना सांगितलंय. सुबोधने याबद्दल खुलासा केला की, हा बायोपिक अजिबातच नाहीये. पण एक भूमिका आहे ज्याच्या संहितेवर मी गेली १५ वर्ष काम करतोय.

मला असं दिसतंय की आता ते दृष्टिक्षेपात आलंय. कदाचित पुढच्या एक-दोन महिन्यात त्याचं लिखाण संपेल. बालगंधर्व झाल्यानंतर मी त्याची संहिता करायला घेतली. खूप अवघड आहे. ती व्यक्तिरेखा करणं अवघड आहे आणि तो चित्रपट करणंही अवघड आहे. पण तरीही मला तो करायचाय आणि ते मी करणार. ते म्हणजे ययाती. ती भूमिका मला करायचीय. आता कुठे त्याला आकार मिळालाय. आणि आता वाटतंय की यावर चित्रपट होऊ शकेल. त्यामुळे हे एक स्वप्न आहे माझं जे मला पूर्ण करायचंय.

मराठी साहित्यविश्वात् ‘ययाती’ कादंबरीला एक मानाचं स्थान आहे. वि.स. खांडेकर यांनी ही कादंबरी लिहिली असून या कादंबरीला १९७४ साली साहित्यविश्वातील सर्वोच्च मानाच्या ज्ञानपीठ पुरस्काराने गौरवण्यात आले होते. ‘संगीत मानापमान’ सिनेमात सुबोधसोबत अभिनेता सुमीत राघवन, वैदेही परशुरामी, उपेंद्र लिमये, निवेदिता सराफ, नीना कुलकर्णी हे कलाकार झळकले आहेत. ‘कट्यार काळजात घुसली’ सिनेमानंतर सुबोध भावेचा दिग्दर्शक म्हणून हा दुसरा सिनेमा आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!