Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

काळजी घ्या ! ‘या’ लोकांनी चुकूनही खाऊ नये आवळा; आजारांना देऊ शकेल आमंत्रण

काळजी घ्या ! ‘या’ लोकांनी चुकूनही खाऊ नये आवळा; आजारांना देऊ शकेल आमंत्रण

आपल्या निसर्गात अशा अनेक गोष्टी आहेत त्याचे आपल्याला बरेच फायदे असतात. त्यात आवळा हा आरोग्यादायी असल्याचे दिसून येते. मात्र, काही लोकांसाठी हा आवळा अपायकारक ठरू शकतो. याने अनेक आजारांना आमंत्रण मिळू शकते. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आता निर्माण झाली आहे.

सर्वजण आवळा हा सुपरफूड मानतात आणि याची एक-दोन नाही तर अनेक कारणे आहेत. त्यात भरपूर व्हिटॅमिन सी असते, त्यात अनेक अँटीऑक्सिडंट्स असतात आणि ते पचन, रोगप्रतिकारक शक्ती आणि त्वचेसाठी फायदेशीर मानले जाते. आवळा रस, लोणचे, पावडर यांसारखे घटक फायद्याचे ठरतात. मात्र, आवळामध्ये काही नैसर्गिक संयुगे असतात ज्यामुळे संवेदनशील व्यक्तींमध्ये ऍलर्जी, खाज सुटणे किंवा सूज येऊ शकते. आवळा खाल्ल्याने काही वैद्यकीय परिस्थिती बिघडू शकते. याचा अर्थ असा की आवळा हा एक सुपरफूड असू शकतो, परंतु तो प्रत्येकासाठी नाही. ते सेवन करण्यापूर्वी तुमचे शरीर आणि तुमच्या आरोग्याची स्थिती समजून घेणे महत्त्वाचे आहे.

आवळा रक्तातील साखर आणखी कमी करू शकतो. जर तुमच्या साखरेचे प्रमाण लवकर कमी झाले, तुम्हाला चक्कर आली किंवा अशक्तपणा जाणवत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय आवळा खाणे टाळा. यामुळे स्थिती आणखी बिघडू शकते. आवळा कधीकधी संवेदनशील पोट असलेल्या लोकांसाठी समस्या निर्माण करू शकतो. आवळा खूप आंबट आणि आम्लयुक्त असल्याने, त्यामुळे आम्लता, छातीत जळजळ, गॅस, फुगणे आणि पोटदुखी होऊ शकते. म्हणून याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!