Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

ट्रक-दुचाकी अपघातात १७ वर्षीय मुलगा ठार; भोकरदन-जालना मार्गावर सोयगाव फाट्याजवळील घटना

ट्रक-दुचाकी अपघातात १७ वर्षीय मुलगा ठार; भोकरदन-जालना मार्गावर सोयगाव फाट्याजवळील घटना

भोकरदन : पाठीमागून येणाऱ्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात १७ वर्षीय मुलगा ठार झाला. भोकरदन-जालना मार्गावरील सोयगाव फाट्याजवळ रविवारी (दि.२२) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. विजय संजय साबळे (वय १७, रा. लिंगेवाडी) असे मृताचे नाव आहे. या अपघातात अन्य एकजण गंभीर जखमी झाला आहे.

या विषयी अधिक माहिती अशी की, लिंगेवाडी येथील गजानन रमेश साबळे हे दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास पुतण्या विशाल संजय साबळे यास घेऊन दुचाकीने भोकरदनकडे येत होते. सोयगाव फाट्याजवळ पाठीमागून येणाऱ्या एका ट्रकने गजानन साबळे यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यामुळे पाठीमागे बसलेला विशाल साबळे गंभीर जखमी झाला. अपघातानंतर स्थानिकांनी त्यास तत्काळ भोकरदन ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले.

या अपघातात गजानन साबळे यांनाही जबर मार लागल्याने ते जखमी झाले. दरम्यान, अपघातानंतर चालक ट्रक जागेवरच सोडून पळून गेला. घटनेची माहिती मिळताच सहायक उपनिरीक्षक भास्कर जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. अपघातामधील मृत झालेला विशाल संजय साबळे (१७) हा शेतकरी कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. त्याच्या अपघाती निधनामुळे लिंगेवाडी येथे हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्ह्याची नोंद नव्हती.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!