Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का! राज्यसभेने राघव चढ्ढा यांच्यासह 7 बंडखोर ‘आप’ खासदारांना दिली भाजप सदस्य म्हणून मान्यता

अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का! राज्यसभेने राघव चढ्ढा यांच्यासह 7 बंडखोर ‘आप’ खासदारांना दिली भाजप सदस्य म्हणून मान्यता

Arvind Kejriwal: आम आदमी पार्टीचे (AAP) निमंत्रक अरविंद केजरीवाल यांच्यासाठी हा आठवडा राजकीयदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक ठरला आहे. शुक्रवारी ‘आप’च्या ७ बंडखोर खासदारांनी घेतलेल्या निर्णयावर आता राज्यसभेने शिक्कामोर्तब केले आहे. राज्यसभा सचिवालयाने राघव चढ्ढा यांच्यासह सर्व बंडखोर खासदारांना भारतीय जनता पक्षाचे (BJP) सदस्य म्हणून अधिकृत मान्यता देणारी अधिसूचना जारी केली आहे. या ऐतिहासिक घडामोडीमुळे राज्यसभेत भाजपचे संख्याबळ आता ११३ वर पोहोचले आहे.

राज्यसभा सचिवालयाची अधिसूचना आणि भाजपची वाढती ताकद
‘आम आदमी पार्टी’ सोडून भाजपमध्ये सामील झालेल्या सातही खासदारांच्या संदर्भात राज्यसभा सचिवालयाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. जारी करण्यात आलेल्या औपचारिक अधिसूचनेनुसार, या खासदारांना आता भाजपचे सदस्य म्हणून गृहीत धरले जाईल. राघव चढ्ढा, संदीप पाठक, अशोक मित्तल, हरभजन सिंग, स्वाती मालीवाल, विक्रम सहानी आणि राजिंदर गुप्ता या सात बड्या नेत्यांच्या भाजप प्रवेशामुळे वरिष्ठ सभागृहातील सत्ताधारी पक्षाची स्थिती अधिक मजबूत झाली आहे.

‘आप’ची अपात्रतेची मागणी फेटाळली?
या बंडाळीनंतर ‘आम आदमी पार्टी’ने आक्रमक पवित्रा घेतला होता. रविवारी, २६ एप्रिल २०२६ रोजी ‘आप’ खासदार संजय सिंह यांनी राज्यसभेचे सभापती सी.पी. राधाकृष्णन यांना पत्र लिहून या सातही खासदारांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली होती. “संबंधित खासदारांचे कृत्य हे ‘पक्षबदल’ (Defection) कायद्यांतर्गत येते, त्यामुळे त्यांना त्वरित अपात्र ठरवावे,” असा युक्तिवाद सिंह यांनी पत्रात केला होता. तसेच, या प्रकरणी पक्ष कायदेशीर लढाई लढण्यास तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते. मात्र, सचिवालयाच्या ताज्या निर्णयामुळे ‘आप’च्या या मागणीला मोठा धक्का बसल्याचे दिसत आहे.

या संपूर्ण नाट्याची सुरुवात शुक्रवारी, २४ एप्रिल २०२६ रोजी झाली, जेव्हा राघव चढ्ढा, संदीप पाठक आणि अशोक मित्तल यांनी पत्रकार परिषद घेऊन ‘आप’ला रामराम ठोकल्याचे जाहीर केले. त्यांच्यासोबत हरभजन सिंग, स्वाती मालीवाल, विक्रम सहानी आणि राजिंदर गुप्ता यांसारख्या प्रसिद्ध चेहऱ्यांनीही पक्षाची साथ सोडल्याने दिल्ली आणि पंजाबच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. एकाच वेळी सात खासदारांनी पक्षांतर केल्याने अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!