Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Satara ZP Election: सातारा जिल्हा परिषद अध्यक्षांच्या खुर्चीला ‘जाती’च्या वादाचे ग्रहण; कुणबी प्रमाणपत्राविरोधात याचिका दाखल

Satara ZP Election: सातारा जिल्हा परिषद अध्यक्षांच्या खुर्चीला ‘जाती’च्या वादाचे ग्रहण; कुणबी प्रमाणपत्राविरोधात याचिका दाखल

Satara ZP Election: सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीचा वाद आता जात पडताळणी समितीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. नवनिर्वाचित अध्यक्षा प्रिया महेश शिंदे यांनी सादर केलेले ‘कुणबी’ जातीचे प्रमाणपत्र बेकायदेशीर आणि नियमांना बगल देऊन मिळवल्याचा आरोप करण्यात आला आहे. हे पद रद्द करण्यासाठी रीतसर याचिका दाखल करण्यात आल्याने साताऱ्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा मोठ्या वादाला तोंड फुटले आहे.

काय आहे मुख्य आक्षेप?
जयदीप कुमार मगर आणि संतोष साळुंखे या तक्रारदारांनी वकील दत्तात्रय घोडके यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली आहे. अध्यक्षपदाच्या निवडीपूर्वी केवळ काही तास आधीच हे प्रमाणपत्र अत्यंत घाईघाईत मिळवण्यात आले, असा आरोप आहे. सादर केलेली वंशावळ आणि इतर पुरावे नियमानुसार नसून ते संशयास्पद असल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे. प्रांत अधिकाऱ्यांनी दिलेले हे प्रमाणपत्र वैध ठरू नये आणि या प्रकरणाची सखोल सुनावणी होऊन कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

राजकीय संघर्षाची पार्श्वभूमी
सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवड ही महायुतीमधील शिवसेना आणि भाजप यांच्यातील थेट संघर्षामुळे आधीच चर्चेत आली होती. या निवडीचे पडसाद विधिमंडळातही उमटले होते, ज्यात मंत्री शंभुराज देसाई यांनी पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. अलीकडेच झालेल्या विषय समिती सभापती निवडीवेळीही राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सदस्यांनी काळ्या फिती लावून आपला निषेध नोंदवला होता.

‘आगे आगे देखो होता है क्या!’
मंत्री शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांनी भाजपच्या स्थानिक नेतृत्वावर (आमदार जयकुमार गोरे आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले) जोरदार टीका केली आहे. शंभुराज देसाई यांनी दिलेला “आगे आगे देखो होता है क्या” हा इशारा आता या कायदेशीर याचिकेच्या रूपाने प्रत्यक्षात येताना दिसत आहे. या कायदेशीर लढाईत आता जात पडताळणी समिती काय निर्णय घेते, यावर साताऱ्याच्या जिल्हा परिषदेचे भवितव्य अवलंबून असणार आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!