Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Sunetra Pawar: ‘आपण सर्व मिळून या संकटावर नक्की मात करू’; सुनेत्रा पवार यांचे कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन

Sunetra Pawar: ‘आपण सर्व मिळून या संकटावर नक्की मात करू’; सुनेत्रा पवार यांचे कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन

पुणे: महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सलग पडणाऱ्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पूरस्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दुष्काळाशी झुंज देणाऱ्या मराठवाड्याला यंदा ओल्या दुष्काळाचा फटका बसला आहे. सोलापूर आणि लातूरमध्ये तर पावसाने थैमान घातल्याने शेतमाल, जनावरे आणि घरे उद्ध्वस्त झाली आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन केले आहे.

सुनेत्रा पवार यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘लातूर, सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील सर्व राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनो, अतिवृष्टी आपल्या हातात नाही, पण माणुसकी जागी ठेवणे हे आपल्या हातात आहे. शेतकऱ्यांसोबत त्यांची जनावरेही वाहून जात असल्याच्या बातम्या ऐकून मन हेलावून गेले आहे. शेतकऱ्यासाठी त्याचे जनावर हे कुटुंबातील सदस्यासारखे असतात. त्यांचे झालेले नुकसान कधीच भरून निघणार नाही. म्हणूनच या संकटात त्यांच्या डोळ्यांतील आसवे पुसणे, हे आपले पहिले कर्तव्य आहे.’

त्यांनी पुढे म्हटलं आहे की, ‘या कठीण प्रसंगी प्रत्येक गावागावात पोहोचा. पूरपाण्यात अडकलेल्या आणि मदतीची वाट पाहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी, जेवणाची व निवाऱ्याची सोय करण्यासाठी दिवस-रात्र एक करा. शासन-प्रशासन आपले काम करत आहे, पण ही जबाबदारी केवळ त्यांची नाही. आपण माणूस म्हणून, कार्यकर्ता म्हणून हातभार लावणे आवश्यक आहे. पक्ष, पद, विचार यापलीकडे जाऊन एकजुटीने लोकांच्या पाठीशी उभे राहा.’

सुनेत्रा पवार यांनी कार्यकर्त्यांवर विश्वास व्यक्त करत म्हटले आहे की, ‘आपण सर्व मिळून या संकटावर नक्की मात करू. आपल्या मातीसाठी आणि आपल्या माणसांसाठी खंबीरपणे उभे राहूया.’

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!